शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 2, 2015 00:52 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री व रविवारी दिवसभर जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली़ या आस्मानी संकटामुळे रबीतील गहू,

उस्मानाबाद : जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री व रविवारी दिवसभर जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली़ या आस्मानी संकटामुळे रबीतील गहू, ज्वारी, हरभरा या पिकाचे मोठे नुकसान झाले असून, द्राक्षासह आंब्याच्या पिकालाही मोठा फटका बसला आहे़जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पहाटे थंडी आणि दिवसभरातील तीव्र उन अशा वातावरणामुळे अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात होती़ जिल्ह्यात सर्वदूर शनिवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरणाची निर्मिती होवून पावसाला सुरूवात झाली़ मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला़ या पावसाचा उस्मानाबाद तालुका व परिसर, तामलवाडी, काक्रंबा, भूम, वाशी, कळंब, ईट, उमरगा तालुका व परिसरात मोठा जोर होता़ शिवाय परंडा, लोहारा परिसरातही पावसाने हजेरी लावली़ तर रविवारी सायंकाळी भूम तालुक्यातील भूम, ईट, उमरगा शहर व परिसर, वाशी, पारगाव, परंडा, इटकूर, तामलवाडी, काक्रंबा, लोहारा परिसरात पुन्हा पाऊस झाला़ या पावसामुळे काढणीस आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा या पिकासह द्राक्ष, आंब्यासह इतर फळबागांचे नुकसान झाले़ तामलवाडी व परिसरातील जवळपास २२ गावातील द्राक्षबागांचे अतोनात नुकसान या पावसामुळे झाले आहे़ तसेच अनेकांनी शेतात काढून ठेवलेली ज्वारी, गहू, हरभरा ही पिके भिजली असून, ज्वारी काळी पडण्याची भिती शेतकरी वर्तवित आहे़ एकूणच सतत अडचणींच्या फेऱ्यात सापडणाऱ्या शेतकऱ्यांसमोर या आस्मानी संकटामुळे मोठे संकट उभा राहिले असून, प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे़