शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

‘कृषी’चे तक्रार निवारण केंद्र

By admin | Updated: May 25, 2014 01:05 IST

उस्मानाबाद : तक्रारी शेतकर्‍यांना सहजरित्या नोंदविता याव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष सुरू केले आहेत

उस्मानाबाद : विविध प्रकारचे बियाणे, खत छापील किंमतीनुसार मिळते की नाही; अथवा अन्य बाबतीत असलेल्या तक्रारी शेतकर्‍यांना सहजरित्या नोंदविता याव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष सुरू केले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी तक्रार नोंदविणे सोपे झाले आहे. सध्या जिल्हाभरातील शेतकर्‍यांची खरीप पेरणीच्या अनुषंगाने लगबग सुरू झाली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहे. खत, बी-बियाण्याची ऐन पेरणीच्या काळात निर्माण होणारी टंचाई लक्षात घेवून शेतकरी आतापासून बियाणे, खताची जमवाजमव करू लागले आहेत. अशावेळी शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या अडचणी तातडीने सोडविल्या जाव्यात, त्यांच्या तक्रारीचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर विशेष कक्ष सुरू करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी कार्यालय आणि तालुकास्तरावर गटविकास अधिकारी कार्यालयात या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सदरील कक्ष सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मदनलाल मिणीयार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, सदरील सुविधेप्रमाणेच शेतकर्‍यांना त्यांच्या तक्रारी कृषी विभागाच्या १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावरही नोंदविता येणार आहेत, असेही मिणीयार यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी) पेरणीपूर्वी बियाणे पारखून घ्यावे यंदा सोयाबीनच्या बियाणची कमतरता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी विशिष्ट कंपनीच्या बियाण्याचा आग्रह न धरता घरगुती बियाण्याची उगवणक्षमता तपासून पेरणीसाठी वापरावे. मात्र, पेरणीपूर्वी बियाण्यावर बीजप्रक्रिया करून घ्यावी. तसेच विविध कंपन्याचे बियाणे खरेदी करताना खात्री करूनच घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी मदनलाल मिणीयार यांनी केले आहे. तक्रार निवारण कक्षातील संपर्क क्रमांक कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद) ०२४७२-२२३७९४, गटविकास अधिकारी (उस्मानाबाद) ०२४७२-२२२१५७, गटविकास अधिकारी (उमरगा) ०२४७५-२५२०२७, गटविकास अधिकारी (लोहारा) ०२४७५-२६६५७९, गटविकास अधिकारी (तुळजापूर) ०२४७१-२४२०४०, गटविकास अधिकारी (परंडा) ०२४७७-२३२०२८, गटविकास अधिकारी (वाशी) ०२४७८-२७६९०० आणि गटविकास अधिकारी (कळंब) ०२४७२-२६२२२५ या क्रमांकावर शेतकर्‍यांना त्यांच्या शंका, अडीअडचणी आणि तक्रारी नोंदविता येणार आहेत.