शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

सेंद्रीय शेती करणारे जाधव यांना कृषीभूषण पुरस्कार

By admin | Updated: August 9, 2014 00:26 IST

सेंद्रीय शेती करणारे जाधव यांना कृषीभूषण पुरस्कार

जालना: अवघ्या तीन एकर जमिनीवरच सेंद्रीय शेतीतून पारंपरिक पिकांसह फळबागा व रोपवाटिका फुलवून लाखोंचे उत्पन्न साधणारे केदार मारोतराव जाधव या अल्पभूधारक शेतकऱ्याची राज्याच्या कृषी विभागाने दखल घेतली. सेंद्रीय शेतीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कृषीभूषण पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.जालना तालुक्यातील निरखेडा येथील जाधव कुटुंबिय. केवळ १ हेक्टर २१ आर म्हणजे तीन एकर जमीन. परंतु या अल्पशा जमिनीतूनही चांगले उत्पादन पदरी पडावे म्हणून जाधव कुटुंबिय पुढे सरसावले. प्रचंड जिद्द, मेहनतीच्या जोरावरच या कुटुंबियांनी राबराब राबून मळा फुलविण्याचा संकल्प केला. काळी जमीन. तीही भुसभुसशीत. या सोन्यासारख्या जमिनीतून बऱ्यापैकी उत्पन्न पदरी पडत होते. मात्र, काळी जमीन भुरखी पडत असल्याची शंका जाधव यांच्या मनात चुकचुकली. त्याचवेळी बिडकीन येथील आयआयआरडी या संस्थेशी संपर्क साधला. तेंव्हा त्यांनी जाधव यांना सेंद्रीय शेतीचा मंत्र दिला. रासायनिक खतामुळेच काळी जमीन भुरखी पडत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जाधव यांनी सेंद्रीय शेतीचा संकल्प केला. काडीकचऱ्यातून कंपोस्ट खत, दोन बैल व दोन गायींपासून शेणखत मिळवून त्यावरच पिके जोपासली. विशेष म्हणजे सेंद्रीय खते वापरताना सुद्धा पिकावरील कीड नियंत्रणाकरिता जीवांमृत, दशपर्णी आर्क, लिंबोळी आर्काचा वापर केला. त्या आधारावरच जाधव यांनी गेल्या सात वर्षांपासून अल्पशा जमिनीतून चांगले उत्पादन घ्यावयास सुरुवात केली. पहिल्या दोन वर्षांत समाधानकारक असले उत्पन्न पदरात पडले नाही. मात्र, निराश न होता जाधव यांनी पुढील वर्षांपासून जोरदार उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली. सद्यस्थितीत तीन एक जमिनीपैकी पावणे दोन एकर जमिनीवर मोसंबीची दीडशे झाडे आहेत. तीही सेंद्रीय शेतीवरच फुलवली आहे. वीस गुठ्यांत सुंदर अशी रोपवाटिका आहे. त्यातून अडीच ते तीन लाख रुपयांचे ते उत्पन्न मिळवित आहेत. सोयाबीन व अन्य पारंपरिक पिके घेत आहेत. गेल्यावर्षी चाळीस आर जमिनीवर सेंद्रीय पद्धतीने पपई जगवून, फुलवून जाधव यांनी सरासरा वीस टन उताऱ्याद्वारे पावणेदोन लाख रुपयांचे उत्पन्न पदरी पाडून घेतले. या सेंद्रीय शेतीतून ते सरासरी दरवर्षी साडेचार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवित आले आहेत. राज्यसरकारच्या कृषी विभागाने अल्पभूधारक असणाऱ्या जाधव यांच्या या यशोगाथेची दखल घेतली. गेल्यावर्षी वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार जाहीर करीत प्रदान केला. तत्पूर्वी जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या शेतीस भेट देऊन कौतुक केले. कृषी अधीक्षक उमेश घाटगे, कृषी अधिकारी नंदकिशोर पुंड, वाघमारे, जिल्हा परिषद कृषी विभागाचे लडके यांच्यासह कृषी विभागतील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचे जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)