शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

जिल्हा निर्मितीला पुन्हा ‘खो’!

By admin | Updated: January 6, 2015 01:09 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई आयुक्तालय लातूरऐवजी नांदेडला करण्याचा घाट घातल्याने बीडलाही झळ पोहोचली आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मार्गाला पुन्हा एकदा मोठा अडसर निर्माण झाला आहे.

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईआयुक्तालय लातूरऐवजी नांदेडला करण्याचा घाट घातल्याने बीडलाही झळ पोहोचली आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मार्गाला पुन्हा एकदा मोठा अडसर निर्माण झाला आहे. मराठवाड्याचे त्रिभाजन झाल्यास लातूर आयुक्तालय स्वतंत्र राहील. त्यामुळे रखडलेला अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा मार्गही सुकर होईल, अशी अंबाजोगाईकरांना आशा आहे.अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती व्हावी या मागणीसाठी मागील २८ वर्षांपासून विविध मार्गाने जनआंदोलनाचा रेटा सुरु आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती केली. त्यावेळीही अंबाजोगाई जिल्हानिर्मितीची मागणी धुडकावून लावण्यात आली. आता लातूर येथे आयुक्तालय डावलल्याने अंबाजोगाई जिल्हा निर्मिती धूसर बनली आहे. लातूर येथे स्वतंत्र महसूल आयुक्तालय सुरू झाले असते तर अंबाजोगाई जिल्हानिर्मितीचा मार्ग मोकळा झाला असता. आता हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी एक धक्का और दो म्हणत अभी नही तो कभी नही हा नारा देत अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आंदोलन पुन्हा सक्रिय झाले आहे.जिल्हा निर्मितीच्या आंदोलनाचा इतिहास असा़़़अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या आंदोलनास खऱ्या अर्थाने वेग आला तो १९८८ पासून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीवर शहरात बैठका झाल्या आणि हा प्रश्न प्रशासकीय पातळीवर प्रकर्षाने मांडण्यात येऊ लागला. शासन दरबारी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध मार्गाने आंदोलने उभारण्यात येऊ लागली. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना जिल्हा निर्मितीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळाचे नेतृ्त्व स्व़ गोपीनाथराव मुंडे यांनी केले होते. तत्कालीन नगराध्यक्ष कै. अरूण पुजारी यांच्या नेतृत्वाखाली देखील उठाव झाला होता़ स्व़ विमल मुंदडा पालकमंत्री असताना त्यांनीही ही मागणी लावून धरली होती़आजतागायत झालेल्या जिल्हा निर्मितीच्या आंदोलनात माजी नगराध्यक्ष कै. शंकरराव डाके, कै. अरूण पुजारी, राजकिशोर मोदी, नंदकिशोर मुंदडा, डॉ. द्वारकादास लोहिया, अमर हबीब यांनी जिल्हा निर्मितीच्या आंदोलनाची कृतीसमितीची धुरा सांभाळत आजपर्यंत झालेल्या सर्वच आंदोलनात राजकीय पक्ष आपले मतभेद व पक्षविधीनिषेध बाजूला ठेवून आंदोलनात सक्रिय झाले व हीच भूमिका आजही अंबाजोगाईकर जोपासतात.अनुकुलता असूनही अडसरअंबाजोगाई जिल्हा निर्मिती व्हावी यासाठी पूरक असणारी सर्वच कार्यालये अंबाजोगाईत गेल्या पाच वर्षांपासून कार्यान्वित आहेत. जिल्ह्याच्या धर्तीवरच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या टोलेजंग इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अशी अनुकुलता उपलब्ध असूनही अडसर कशासाठी? हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण होत आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, विशेष भूसंपादनाची तीन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, उपअधीक्षक लघु पाटबंधारे कार्यालय, अशी सर्वच कार्यालये कार्यान्न्वित असून जिल्ह्यासाठी लागणारी सर्व संरचना आज उपलब्ध स्थितीत आहे. शहरालगत वनखात्याची सुमारे ४ हजार एकर जमीन उपलब्ध आहे. त्या शिवाय सरकारी मोकळी जमीनही उपलब्ध आहे. प्रशासनाच्या जुन्या इमारती सुस्थितीत उपलब्ध असल्याने जिल्ह्यासाठी लागणारी सर्व कार्यालये सहज कार्यान्वित होण्यासाठी पाहिजे तेवढी कार्यालयीन जागाही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.