शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक !

By admin | Updated: January 8, 2017 23:47 IST

उस्मानाबाद : खरीप हंगामाची पैसेवारी जिल्हा प्रशासनाने नुतीच जाही केली आहे.

उस्मानाबाद : खरीप हंगामाची पैसेवारी जिल्हा प्रशासनाने नुतीच जाही केली आहे. त्यानुसार जिल्हभारातील सर्व ७३७ गावांची पैसेवारी पन्नास टक्क्यांवर असल्याचे समोर आले आहे. खरीप हंगामाच्या सुरूवातील बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यानंतर काहीकाळ ओढ दिली. परंतु, शेवटच्या टप्प्यात जिल्हाभरात धो..धो पाऊस झाला. तब्बल तीन ते चार वर्षांनंतर यंदा पावसाने सरासरी ओलांडली. अनेक गावांमध्ये खरीप पिकांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले. जिल्हभरातील बहुतांश प्रकल्प शंभर टक्के भरले. अधिकच्या पर्जन्यमानाचाच पिरणाम म्हणून खरीप हंगामाची पैसेवारीचे प्रमाण पन्नास पैसेपेक्षा अधिक आले आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरूवातील प्राथमिक स्वरूपात पैसेवारी जाहीर केली होती. त्यानंतर डिसेंबरअखेर अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील १२८ गावांची सरासरी पैसेवारी ५३ एवढी जाहीर झाली आहे.त्यानंतर तुळजापूर तालुक्यातील १२३ गावांची ५४, उमरगा तालुक्यातील ९४ गावांची सर्वाधिक ५७ पैसे, लोहारा तालुक्यातील ४७ गावांची ५४ पैसे, भूम तालुक्यातील ९६ गावांची ५२ पैसे, परंडा तालुक्यातील ९६ गावांची ५४ पैसे, कळंब तालुक्यातील ९७ गावांची ५३ पैसे आणि वाशी तालुक्यातील ५४ गावांची पैसेवारी ५३ पैसे एवढी जाहीर करण्यात आली आहे. सदरील पैसेवारी ही अंतीम आहे. दरम्यान, पैसेवारी पन्नास पैशापेक्षा अधिक असल्याने एकाही गावाला यंदा विशेष सवलती मिळणार नाहीत.