शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

खाकीतील असंतोष

By admin | Updated: March 18, 2016 01:58 IST

संजय तिपाले , बीड ‘मंै भी यहॉँ अँग्री यंग मॅन बनकर आया था... दो दिन में मुझे गांधीजी का बंदर बना दिया इन सिनीअर लोगोंने... ना देखो, ना बोलो, ना सुनो.

संजय तिपाले , बीड‘मंै भी यहॉँ अँग्री यंग मॅन बनकर आया था... दो दिन में मुझे गांधीजी का बंदर बना दिया इन सिनीअर लोगोंने... ना देखो, ना बोलो, ना सुनो... कोई साथ नही देगा आपका’ हा ‘सिंघम’ चित्रपटातील ‘डायलॉग’ व्यवस्थेतील वास्तव अधोरेखित करतो. ‘बॉसगिरी’त पोलीस कर्मचारी पावलोपावली कसे भरडले जातात? याचा प्रत्यय अंबाजोगाईतील पोलीस कर्मचारी संतोष चाटे यांच्या आत्महत्येने पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. खाकीचे सुरक्षाकवच असताना अस्वस्थता व असुरक्षिततेची भावना जगणेच नाकारायला सांगते त्यावरुन ही घुसमट काळजात किती खोलवर घाव करतेयं याची प्रचिती आली. गुरुवारी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून खाकी वर्दीआड कर्मचारी भोगत असलेल्या वेदना समोर आल्या, त्या अशा... सर्वांच्या सुरक्षेचा भार स्वत:च्या खांद्यावरुन वाहणाऱ्या पोलिसांच्या वाट्याला कायम उपेक्षाच येते. पोलिसांची ना संघटना आहे ना त्यांना सरकारविरोधात बोलण्याचा अधिकार! कायद्याच्या बेड्यांची सल आरोपींना कमी; पण कायद्याच्या रखवालदारांनाच अधिक आहे. त्यात ‘बॉस इज आॅलवेज राईट’ या अलिखित नियमांचे वार झेलत कर्तव्यपूर्ती करावी लागते.पोलिसांनी साधी ट्रिपलसीट गाडी अडवली तरीही चार पुढाऱ्यांचे फोन, वरिष्ठांकडून खडेबोल असा तोंड दाबून बुक्क्यांचा मार हे पोलीस सहन करत असतात. कायद्याची अंमलबजावणी करताना खादीपुढे खाकीला बरेचदा माघार घ्यावी लागते, त्यामुळे पोलिसांचा नुसता वचक कमी झाला नाही तर चारचौघांत अपमानाचे बोलही ऐकावे लागतात.पोलीस नाईक संतोष चाटे प्रकरणाने पोेलिसांच्या अस्वस्थेला पुन्हा वाचा फुटली आहे. मात्र, यातून शासन, प्रशासन व समाज काही धडा घेईल का? हा कळीचा प्रश्न आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे कामकाजातील निर्णय बदलावा लागतो का? या प्रश्नावर ३६ टक्के कर्मचाऱ्यांनी हो असे उत्तर दिले. ५४ टक्के कर्मचाऱ्यांना निर्णय बदलण्यासाठी वरिष्ठांच्या दबावाला सामोरे जावे लागत नाही. १० टक्के कर्मचाऱ्यांना याचा वाईट अनुभव कधीकधीच आला आहे.कामकाजातील ताणतणावाचे परिणाम कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांनाही भोगावे लागतात का? यावर ६४ टक्के कर्मचाऱ्यांनी होकार दर्शविला. कौटुंबिक वातावरणावर परिणाम होत नाही असे म्हणणारे कर्मचारी केवळ १४ टक्के आहेत. कधीकधीच कुटुंबालाही ताण सहन करावा लागतो असे २२ जणांना वाटते.एका कर्मचाऱ्याने सांगितले, नातेवाईकांच्या लग्नकार्य, अंत्यविधीलाही उपस्थित राहता येत नाही. पोलीस म्हणून काम करताना कधी-कधी अपमानास्पद प्रसंग वाट्याला येतात. त्यामुळे भरती होऊन घोडचूक केली, असेही वाटायला लागते. एका महिला कर्मचाऱ्याने म्हटले की, वरिष्ठाच्या आदेशाचे पालन करत कर्मचाऱ्यांनी काम करायचे अन् काही बाबी अंगलट आल्यावर वरिष्ठांनी हात झटकायचे असे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिकार असून त्याचा वापर करता येत नाही. पोलीस खात्यात खूप उन्हाळे- पावसाळे पाहिले. आता स्वेच्छा नोकरी घ्यावी वाटते. मला आठवते मी भाड्याच्या घरात रहायचो. पत्नी व दोन मुले घरी होती, मी गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तावर होतो. चोरांनी मध्यरात्री घरात हात साफ केला. लोकांची काळजी करताना कुटुंबासोबत जगायचे राहून गेले असे म्हणत त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.पोलिसांच्या न्यायहक्कासाठी लढापोलीस कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून लढा देणार असल्याचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी सांगितले. स्वत:चे कुटुंब वाऱ्यावर सोडून इतरांची काळजी करणाऱ्या पोलिसांबाबत संवेदनशीलता दाखवावी, अशी मागणी त्यांनी केली.