शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

खाकीतील असंतोष

By admin | Updated: March 18, 2016 01:58 IST

संजय तिपाले , बीड ‘मंै भी यहॉँ अँग्री यंग मॅन बनकर आया था... दो दिन में मुझे गांधीजी का बंदर बना दिया इन सिनीअर लोगोंने... ना देखो, ना बोलो, ना सुनो.

संजय तिपाले , बीड‘मंै भी यहॉँ अँग्री यंग मॅन बनकर आया था... दो दिन में मुझे गांधीजी का बंदर बना दिया इन सिनीअर लोगोंने... ना देखो, ना बोलो, ना सुनो... कोई साथ नही देगा आपका’ हा ‘सिंघम’ चित्रपटातील ‘डायलॉग’ व्यवस्थेतील वास्तव अधोरेखित करतो. ‘बॉसगिरी’त पोलीस कर्मचारी पावलोपावली कसे भरडले जातात? याचा प्रत्यय अंबाजोगाईतील पोलीस कर्मचारी संतोष चाटे यांच्या आत्महत्येने पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. खाकीचे सुरक्षाकवच असताना अस्वस्थता व असुरक्षिततेची भावना जगणेच नाकारायला सांगते त्यावरुन ही घुसमट काळजात किती खोलवर घाव करतेयं याची प्रचिती आली. गुरुवारी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून खाकी वर्दीआड कर्मचारी भोगत असलेल्या वेदना समोर आल्या, त्या अशा... सर्वांच्या सुरक्षेचा भार स्वत:च्या खांद्यावरुन वाहणाऱ्या पोलिसांच्या वाट्याला कायम उपेक्षाच येते. पोलिसांची ना संघटना आहे ना त्यांना सरकारविरोधात बोलण्याचा अधिकार! कायद्याच्या बेड्यांची सल आरोपींना कमी; पण कायद्याच्या रखवालदारांनाच अधिक आहे. त्यात ‘बॉस इज आॅलवेज राईट’ या अलिखित नियमांचे वार झेलत कर्तव्यपूर्ती करावी लागते.पोलिसांनी साधी ट्रिपलसीट गाडी अडवली तरीही चार पुढाऱ्यांचे फोन, वरिष्ठांकडून खडेबोल असा तोंड दाबून बुक्क्यांचा मार हे पोलीस सहन करत असतात. कायद्याची अंमलबजावणी करताना खादीपुढे खाकीला बरेचदा माघार घ्यावी लागते, त्यामुळे पोलिसांचा नुसता वचक कमी झाला नाही तर चारचौघांत अपमानाचे बोलही ऐकावे लागतात.पोलीस नाईक संतोष चाटे प्रकरणाने पोेलिसांच्या अस्वस्थेला पुन्हा वाचा फुटली आहे. मात्र, यातून शासन, प्रशासन व समाज काही धडा घेईल का? हा कळीचा प्रश्न आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे कामकाजातील निर्णय बदलावा लागतो का? या प्रश्नावर ३६ टक्के कर्मचाऱ्यांनी हो असे उत्तर दिले. ५४ टक्के कर्मचाऱ्यांना निर्णय बदलण्यासाठी वरिष्ठांच्या दबावाला सामोरे जावे लागत नाही. १० टक्के कर्मचाऱ्यांना याचा वाईट अनुभव कधीकधीच आला आहे.कामकाजातील ताणतणावाचे परिणाम कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांनाही भोगावे लागतात का? यावर ६४ टक्के कर्मचाऱ्यांनी होकार दर्शविला. कौटुंबिक वातावरणावर परिणाम होत नाही असे म्हणणारे कर्मचारी केवळ १४ टक्के आहेत. कधीकधीच कुटुंबालाही ताण सहन करावा लागतो असे २२ जणांना वाटते.एका कर्मचाऱ्याने सांगितले, नातेवाईकांच्या लग्नकार्य, अंत्यविधीलाही उपस्थित राहता येत नाही. पोलीस म्हणून काम करताना कधी-कधी अपमानास्पद प्रसंग वाट्याला येतात. त्यामुळे भरती होऊन घोडचूक केली, असेही वाटायला लागते. एका महिला कर्मचाऱ्याने म्हटले की, वरिष्ठाच्या आदेशाचे पालन करत कर्मचाऱ्यांनी काम करायचे अन् काही बाबी अंगलट आल्यावर वरिष्ठांनी हात झटकायचे असे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिकार असून त्याचा वापर करता येत नाही. पोलीस खात्यात खूप उन्हाळे- पावसाळे पाहिले. आता स्वेच्छा नोकरी घ्यावी वाटते. मला आठवते मी भाड्याच्या घरात रहायचो. पत्नी व दोन मुले घरी होती, मी गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तावर होतो. चोरांनी मध्यरात्री घरात हात साफ केला. लोकांची काळजी करताना कुटुंबासोबत जगायचे राहून गेले असे म्हणत त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.पोलिसांच्या न्यायहक्कासाठी लढापोलीस कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून लढा देणार असल्याचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी सांगितले. स्वत:चे कुटुंब वाऱ्यावर सोडून इतरांची काळजी करणाऱ्या पोलिसांबाबत संवेदनशीलता दाखवावी, अशी मागणी त्यांनी केली.