शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

पावसाअभावी खरीप कोमेजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:03 IST

पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांची स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांची स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. आठवडाभरात पाऊस न झाल्यास कपाशीसह सोयाबीन, तूर, मूग ही पिके पूर्णत: हातची जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी गुरुवारी विरेगाव व पाचन वडगाव मंडळातील गावांमध्ये जाऊन पीक परिस्थितीचा आढावा घेतला.तालुक्यातील विरेगाव व पाचन वडगाव या मंडळातील वडीवाडी, कारला, कोडी, माली पिंपळगाव, हिस्वन, खणेपुरी, हातवण, भाटेपुरी इ. गावांमध्ये सुरुवातीपासून कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील बहुतांश पिके सुकली आहेत. काही ठिकाणी शेतकºयांनी सुकलेल्या पिकांमध्ये जनावरे सोडली आहेत, तर काहींनी सोयाबीन पीक मोडले आहे. त्यामुळे या भागातील पिकांचा पंचनामा करण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी शेतात जाऊन स्थितीचा आढावा घेतला. परिसरातील शेतकºयांशी चर्चा केली. मागील अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने बरीच पिके वाया गेली आहेत.आठवडाभरात पाऊस न झाल्यास कपाशीही वाया जाण्याची शक्यता असून, या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याचे शेतकºयांनी जोंधळे यांच्या निदर्शनास आणून दिले. परिसरातील किती शेतकºयांनी पीकविमा भरला, याबाबतची माहिती जिल्हाधिकाºयांनी जाणून घेतली. दोन्ही मंडळातील गावांना पिण्यासाठी पाणी व जनावरांसाठी चारा याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येईल. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी दशरथ तांभाळे, तहसीलदार विपीन पाटील, नायब तहसीलदार संदीप ढाकणे, तालुका कृषी अधिकारी राम रोडगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, गोविंद कुटे यांच्यासह शेतकºयांची उपस्थिती होती.