शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

खरीप हंगामात केवळ तुरीवरच शेतकऱ्यांची मदार

By admin | Updated: November 9, 2016 01:23 IST

बीड उशिरा झालेल्या पावसाचा केवळ तुरीला फायदा झाला असून, या पिकाच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

राजेश खराडे  बीडहंगामाच्या सुरवातीला अत्यल्प पाऊस, कीड, रोगराई व पिके अंतिम टप्प्यात असताना बसलेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात सोयाबीन, बाजरी या पिकांसह कडधान्याचे मोठे नुकसान झाले होते. उशिरा झालेल्या पावसाचा केवळ तुरीला फायदा झाला असून, या पिकाच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरवर्षी खरिपातील सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांनीच शेतकऱ्यांना तारले आहे. यंदा मात्र निसर्गाच्या अवकृपेने खरीप हंगामाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. रिमझिम पावसाच्या आधारावर काही प्रमाणात उडीद, मूग शेतकऱ्यांच्या पदरी पडले खरे; मात्र उत्पादनात मोठी घट झाली होती. सोयाबीन, बाजरीची तर मोडणी करून रबी हंगामाला क्षेत्र रिकामे करण्यात आले होते. बागायती क्षेत्राप्रमाणे तुरीला अतिवृष्टीचा फायदा झाला होता. त्यामुळे सध्या तूर बहरली असून फुलोऱ्यात आहे. असे असताना देखील शेंग पोखरणारी व शेंगमाशीचा प्रादुर्भाव तुरीवर जाणवू लागला आहे. या दोन्हीतून पिकांचा बचाव झाल्यास तुरीच्या उत्पादनात तिप्पट वाढ होणार असल्याचे कृषी अधिकारी रामेश्वर चांडक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शिवाय लागवडीपूर्वी केलेलीे मशागत व संरक्षण उपाययोजना याचा फायदाही उत्पादनाच्या रूपातून शेतकऱ्यांना होणार आहे. सद्य:स्थितीला कापूस आणि तूर ही दोनच पिके वावरात असून, गुलाबी बोंडअळीचा धोका कापसाला वाढला आहे. यामध्ये कापसाचे बोंड दिसते खरे; मात्र या अळ्या बोंडातील कापूस उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे कापसाचे उत्पादन निम्म्यावर येत आहे. उर्वरित काळात शेतकऱ्यांनी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या पद्धतीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. याकरिता कृषी अधिकाऱ्यांचीही भूमिका महत्वाची आहे. दरम्यान, यंदा दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात खरिपात अपेक्षित उत्पादन पदरात पडले नाही.