शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

खरीप हंगामात केवळ तुरीवरच शेतकऱ्यांची मदार

By admin | Updated: November 9, 2016 01:23 IST

बीड उशिरा झालेल्या पावसाचा केवळ तुरीला फायदा झाला असून, या पिकाच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

राजेश खराडे  बीडहंगामाच्या सुरवातीला अत्यल्प पाऊस, कीड, रोगराई व पिके अंतिम टप्प्यात असताना बसलेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात सोयाबीन, बाजरी या पिकांसह कडधान्याचे मोठे नुकसान झाले होते. उशिरा झालेल्या पावसाचा केवळ तुरीला फायदा झाला असून, या पिकाच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरवर्षी खरिपातील सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांनीच शेतकऱ्यांना तारले आहे. यंदा मात्र निसर्गाच्या अवकृपेने खरीप हंगामाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. रिमझिम पावसाच्या आधारावर काही प्रमाणात उडीद, मूग शेतकऱ्यांच्या पदरी पडले खरे; मात्र उत्पादनात मोठी घट झाली होती. सोयाबीन, बाजरीची तर मोडणी करून रबी हंगामाला क्षेत्र रिकामे करण्यात आले होते. बागायती क्षेत्राप्रमाणे तुरीला अतिवृष्टीचा फायदा झाला होता. त्यामुळे सध्या तूर बहरली असून फुलोऱ्यात आहे. असे असताना देखील शेंग पोखरणारी व शेंगमाशीचा प्रादुर्भाव तुरीवर जाणवू लागला आहे. या दोन्हीतून पिकांचा बचाव झाल्यास तुरीच्या उत्पादनात तिप्पट वाढ होणार असल्याचे कृषी अधिकारी रामेश्वर चांडक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शिवाय लागवडीपूर्वी केलेलीे मशागत व संरक्षण उपाययोजना याचा फायदाही उत्पादनाच्या रूपातून शेतकऱ्यांना होणार आहे. सद्य:स्थितीला कापूस आणि तूर ही दोनच पिके वावरात असून, गुलाबी बोंडअळीचा धोका कापसाला वाढला आहे. यामध्ये कापसाचे बोंड दिसते खरे; मात्र या अळ्या बोंडातील कापूस उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे कापसाचे उत्पादन निम्म्यावर येत आहे. उर्वरित काळात शेतकऱ्यांनी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या पद्धतीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. याकरिता कृषी अधिकाऱ्यांचीही भूमिका महत्वाची आहे. दरम्यान, यंदा दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात खरिपात अपेक्षित उत्पादन पदरात पडले नाही.