शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कन्हेरवाडीची ‘सिंगल फेज’ योजना नावालाच

By admin | Updated: July 16, 2014 01:24 IST

परळी: शहरापासून जवळच असलेल्या कन्हेरवाडी गावात ‘सिंगल फेज’ योजनेच्या ८ डीपी उभ्या केल्या. मात्र अद्यापही या सिंगल फेज योजनेच्या डीपीवरुन कनेक्शन सुरू केलेले नाही

परळी: शहरापासून जवळच असलेल्या कन्हेरवाडी गावात ‘सिंगल फेज’ योजनेच्या ८ डीपी उभ्या केल्या. मात्र अद्यापही या सिंगल फेज योजनेच्या डीपीवरुन कनेक्शन सुरू केलेले नाही. मागील चार वर्षांपासून ही योजना मंजूर झालेली असूनही अद्याप कार्यान्वित नाही. त्यामुळे ही योजना केवळ नावालाच आहे, की काय? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.परळी-अंबाजोगाई राज्य रस्त्यावर असलेल्या कन्हेरवाडी येथे बारा हजार लोकसंख्या आहे. या गावात ४ वर्षांपूर्वी सिंगल फेज योजनेंतर्गत विद्युत खांब व डीपी बसविण्यात आल्या आहेत. मात्र यावरुन अद्यापही वीजपुरवठा सुरू केलेला नाही. त्यामुळे सकाळी ४ ते ११ व दुपारी ४ ते ९.३० या दरम्यान वीजपुरवठा खंडित असतो. ही योजना कार्यान्वित न झाल्याने अनेक अडचणींचा सामना येथील ग्रामस्थांना करावा लागतो. भारनियमनाने वैतागलेल्या ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या अभियंत्याकडे निवेदनाद्वारे आपली तक्रार केली. लवकरात लवकर प्रश्न मार्गी न लागल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा एच.यू. फड, विकास मुंडे, समाधान मुंडे, विष्णू फड, बालासाहेब फड यांनी दिला आहे.योजना का सुरू नाही?जिरेवाडी व कन्हेरवाडीला सिंगल फेज योजना सुरु का केली जात नाही? कन्हेरवाडीला अंधारात का ठेवले जाते? किती दिवस येथील ग्रामस्थांनी अंधाराचा सामना करायचा? विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण ? यासारखे अनेक प्रश्न सामाजिक कार्यकर्ते एच.यू. फड यांनी उपस्थित केले आहेत. ही योजना सुरू न करण्यात अधिकारी, कर्मचारी यांचाही समावेश आहे, असा आरोप फड यांनी केला असून, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.याबाबत शाखा अभियंता भालचंद्र चाटे म्हणाले, कन्हेरवाडी सिंगल फेज योजनेंतर्गत जिरेवाडी गावाचाही समावेश आहे. जिरेवाडीत डीपी बसविल्यास जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे ही सिंगल फेज योजना कार्यान्वित होत नाही, असे सांगितले.जिरेवाडी ग्रामस्थांचा डीपीसाठी विरोध नाहीशाखा अभियंता चाटे म्हणाले होते, जिरेवाडी गावात सिंगल फेजसाठी डीपी बसविण्यास जागा उपलब्ध नाही. मात्र जिरेवाडी ग्रामस्थांचा डीपीसाठी कुठलाही विरोध नाही. येथील ग्रामस्थांनाही बारा तास भारनियमनाचा सामना करावा लागतो. या योजनेला आमचा विरोध नसल्याचे जिरेवाडीचे माजी सरपंच तुकाराम मुंडे यांनी सांगितले.भारनियमनाला नागरिक वैतागलेसकाळी ७ व सायंकाळी ५ तास भारनियमन केले जात असल्याने या भारनियमनाला ग्रामस्थ वैतागले आहेत. ज्या वेळेत वीज आहे अशा वेळेतही वीज गुल होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. लवकरात लवकर ही योजना सुरू करुन ग्रामस्थांचे हाल थांबवावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे. (वार्ताहर)