शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

कंधारात मिरची-कांद्याचा वांदा

By admin | Updated: July 22, 2014 00:18 IST

कंधार : दरवर्षी आषाढ महिन्यात भाजीपाल्याचे भाव घसरतात, परंतु दीड महिना संपत आला तरीही पावसाचा मागमूस नाही़ मोठ्या लागवडीअभावी भाजीपाल्याचे भाव महिन्यात दुप्पट झाले आहेत़

कंधार : दरवर्षी आषाढ महिन्यात भाजीपाल्याचे भाव घसरतात, परंतु दीड महिना संपत आला तरीही पावसाचा मागमूस नाही़ मोठ्या लागवडीअभावी भाजीपाल्याचे भाव महिन्यात दुप्पट झाले आहेत़ हिरवी मिरची तिखट अन् कांदा डोळ्यात पाणी आणत असल्याचे चित्र आहे़मागील वर्षी विक्रमी पावसाची नोंद झाली़ नदी-नाले, तलावात मुबलक जलसाठा पावसाळ्यात होता़ उपलब्ध जलसाठ्याने खरीप हंगामातील कसर भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रबी व भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली़ परंतु निसर्गाच्या लहरीपणा रबीला आडवा आला़ गारपिटीने शिवारात गारांचे ढीग साचले़ त्याचा फटका जवळपास ६० गावांना बसला़ शिवारातील हिरव्या पिकाकडे पाहून आनंद व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांना दीर्घकाळ आनंद लुटता आला नाही़ त्यापूर्वी भाजीपाला लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही अपेक्षित भाव मिळाला नाही़ सहा महिन्यांपूर्वी उपलब्ध जलसाठ्याने लागवड केलेला भाजीपाला मुबलक होता़ त्यामुळे ग्राहकांची मोठी चंगळ झाली़ परंतु शेतकऱ्यांना मात्र याचा मोठा भूर्दंड सहन करावा लागला़ आता मात्र उलटे चित्र झाले आहे़फळभाज्या व पालेभाज्यात जीवनसत्वे असल्याने नागरिक आहारात त्याचा वापर करतात़ आणि आपले आरोग्य अबाधित ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात़ शेतकऱ्यांना लागवड परवडली पाहिजे, आणि उत्पन्न अपेक्षित मिळाले पाहिजे़ तसेच नागरिकांनाही खरेदीचा भाव परवडून आरोग्य चांगले ठेवणे आवश्यक असते़ परंतु याचा ताळेबंद निसर्ग लहरीपणाने कमालीचा बिघडत चालला आहे़ कधी शेतकरी आर्थिक गर्तेत जात आहे़ तर कधी ग्राहकाच्या खिशाला मोठी कातर लागत आहे़आषाढ महिना भर पावसाचा असतो़ पावसाळ्यात भाजीपाला स्वस्त मिळतो, असा संकेत दरवर्षी असतो़ त्याला निसर्गाने छेद दिला असल्याचा अनुभव सर्वांना येत आहे़ आगामी काळात पावसाची हजेरी यावरच भाजीपाला उत्पादन व भाव अवलंबून आहे़ (वार्ताहर)माहुरातही भाजीपाला कडाडलाश्रीक्षेत्र माहूर : पाऊस वेळेवर न झाल्याने पावसाळी भाजीपाला अभावी भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडल्याने दोन रुपये किलोने मिळणारे टमाटे १२० रुपये किलोवर गेल्याने सोमवारी माहूरच्या बाजारात शुकशुकाट तर मजुरी नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून शेतातील बांधावर व गावातील पडीक जागेत उगवणाऱ्या तरोट्याची भाजी खाण्याची वेळ आली असून सर्वच भाजीपाला जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने नोकरदारांचे आर्थिक बजेट कोलमडले़सोमवारी माहूरच्या बाजारात पाऊस न झाल्याने अत्यल्प भाजीपाला आला होता़ त्यात घराचे आर्थिक बजट सांभाळणाऱ्या महिला वर्गाची भाजी खरेदीसाठी गर्दी तर पवित्र रमजान महिना असल्याने मुस्लिम बांधवांनीही प्रचंड गर्दी केली होती़ भाजीपाला कमी आल्याने त्यातच भाजीपाला व इतर वस्तूंचे भाव प्रचंड वाढल्याने किरकोळ विक्रीत टमाटे १२० रुपये किलो, आलू ४० रुपये किलो, हिरवी मिरची ८० रुपये, फूलकोबी १२० रुपये, अद्रक २०० रुपये, सांभार १०० रुपये, मेथीची भाजी १०० रुपये किलोप्रमाणे विक्री होत होता़ इतर भाजीपाला दुपारी १२ वाजेपर्यंत संपला़ तर सुकामेवा, टरबूज, पेंडखजूर व इतर साहित्याची प्रमाणाबाहेर दर झाल्याने ग्राहकांकडून खरेदी कमी तर दरांची चौकशीच अधिक होताना दिसल्याने व्यापारीही वैतागलेल्या अवस्थेत तर ग्राहक संतापलेल्या अवस्थेत दिसत होते़ माहूर तालुक्यात जुलै महिना संपत आला तरीही पेरणीलायक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी केलेली तिबार पेरणीही मातीत मिसळल्याने व कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यापासून वेतन न आल्याने मजुरांनाही रोजगार नाही़ त्यातल्या त्यात भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने आर्थिक परिस्थितीत सुदृढ असलेल्या नागरिकांनाही तान सहन करावा लागत असल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त आहे. (वार्ताहर)सहा महिन्यापूर्वीचे जुलै २०१४भाव मधील भावकांदा ४० रूपये किलो ८० रुपयेहिरवी मिरची ४०-६० ८० ते १०० दोडके ४० ते ५० रू़ ८० ते ९०मेथी ३० ते ४० रू़ ८० ते १०० कोथींबीर ३० ते ४० रू़ १८० ते २००वांगे २० ते ३० रु़किलो ४० ते ५०टमाटे २० ते ३० रु़कि़ ८० रू़कि़