शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या-विमुक्तांचा धडकला जोरदार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:10 IST

आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय भटके विमुक्त आदिवासी संघर्ष महासंघाच्या वतीने आज क्रांतीचौकातून मोठा मोर्चा काढण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय भटके विमुक्त आदिवासी संघर्ष महासंघाच्या वतीने आज क्रांतीचौकातून मोठा मोर्चा काढण्यात आला. तो विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. तेथे झालेल्या जाहीर सभेत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.जिल्ह्याच्या कानाकोपºयातून भटक्या-विमुक्त समाजाचे स्त्री-पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. त्यात अनेक जण पारंपरिक वेषभूषेत होते. एकलव्य, संत रविदास, सेवालाल महाराज, शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचा जयजयकार मोर्चेकरी करीत होते. दोन-दोनच्या रांगेत प्रत्येक जण चालत होता. लाऊडस्पीकरवरून त्यांना संयोजकांतर्फे योग्य त्या सूचना दिल्या जात होत्या.या मोर्चात सहभागी झालेल्या बहुतांश जणांजवळ रेशन कार्ड नाही, मतदान कार्ड नाही, आधार कार्डही नाही. शिवाय राहायला घरही नाही. अनेक जणांनी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या अशा- सीमा राठोड या बंजारा समाजाच्या मुलीच्या निर्घृण हत्येची कसून चौकशी करून दोषींना फाशी देण्यात यावी, वन विभागाच्या जमिनी व गायरान जमिनी कसणाºयांच्या नावे सातबारा करण्यात यावा, जातीचे दाखले, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड घरपोच देण्यात यावेत, आदिवासी शबरी माता विकास महामंडळाला एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या महामंडळाचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात यावे, वसंतराव नाईक महामंडळाची कर्जे माफ करण्यात यावीत, शिक्षणाचे खाजगीकरण रद्द करण्यात यावे, आदिवासी, भटक्या, विमुक्त व ओबीसी शेतकºयांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी, भिल्ल- आदिवासी, भटके- विमुक्त सगाजाचे लोक ज्या गावात राहतात, त्या गावाचे तळे मच्छीमारासाठी उपलब्ध करून द्यावे, मंडल आयोगाच्या शिफारशींची शंभर टक्के अंमलबजावणी करून ओबीसींना न्याय देण्यात यावा.महासंघाचे अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर व कार्याध्यक्ष राजपालसिंह राठोड यांनी या मोर्चाचे संयोजक म्हणून काम पाहिले. प्राचार्य ग.ह. राठोड, अंबादास राठोड, प्राचार्य सुनील वाकेकर, मुकुंद सोनवणे, जि.प. सदस्य रमेश गायकवाड, प्रा. प्रकाश वाघमारे, पंडित चव्हाण, राजेंद्र जाधव, गोरख मोरे, नामदेव दळवे, अशोक मोरे, डॉ. कृष्णा राठोड, ज्ञानेश्वर ढाकणे, गणेश चव्हाण, प्रा. आर.जी. देठे, पल्लवी खंडेराव, अंकुश चव्हाण, अजित तडवी, सुनील कचरू ठाकरे, जगन बाबर, बाबालाल जाधव, महादू पगारे, अरविंद कांबळे, दादाराव आळणे, प्रदीप त्रिभुवन, धम्मानंद गायकवाड, विनोद वाघमारे, रत्नदीप कांबळे, कोंडबा हटकर, मिलिंद वानखेडे, महादेव आंधळे, विष्णू वखरे, डॉ. शरद वानखेडे, संजय मेडे, अजित तडवी आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. खोजेवाडी, वडगाव, दिवशी पिंपळगाव, रांजणगाव पोळ, सिद्धिशिरसगाव, दायगाव, देहडे, गाजगाव, पिंपळगाव खंडाळा, वैरागड, खडक नारळा, डोणगाव, बाभूळगाव नांगरे, टाकळी, वडाची वाडी, टुणकी, टेंभी, पालखेड, कानडगाव, शिरोडी, तुर्काबाद खराडी, कौडगाव, देवगाव रंगारी, फेरन जळगाव, चौका, पिंपळखुंटा, दौलताबाद, बोरसर आदी गावांमधून हे भटके-विमुक्त आले होते.