शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

वर्षभरात साडेतीन हजार ग्राहकांना न्याय

By admin | Updated: March 15, 2016 01:06 IST

गजेंद्र देशमुख , जालना ग्राहकांची फसवूणक होऊ नये, झाल्यास त्यांना न्याय मिळावा म्हणून ग्राहक मंच आहे. या ग्राहक मंचात स्थानिक सोबतच आॅनलाईन

गजेंद्र देशमुख , जालनाग्राहकांची फसवूणक होऊ नये, झाल्यास त्यांना न्याय मिळावा म्हणून ग्राहक मंच आहे. या ग्राहक मंचात स्थानिक सोबतच आॅनलाईन खरेदी दरम्यान झालेल्या फसवुणकीबाबतही न्याय मिळतो. मंगळवारी होणाऱ्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकमंचच्या अध्यक्षा अ‍ॅड. नीलिमा संत यांनी विविध मुद्यांवर ग्राहक हितांची जाणीव करून दिली.दरवर्षी १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. व्यावसायिक व ग्राहक यांचे नाते खरेदीपुरतेच असल्याने सौहार्दपूर्ण असते. मात्र, उत्पादनात अथवा एखाद्या वस्तूत बिघाड आल्यास ग्राहक व व्यासायिकांत तणावपूर्ण संबंध बनतात. यातूनच कोर्ट कचेऱ्या होतात. काही ग्राहक ग्राहकमंचचा पर्याय निवडतात. ग्राहक मंच ग्राहकांचे हित व कर्तव्याची जाणिव करून देते. ग्राहक हिताला प्राधान्य देणारी ही संस्था असल्याचे संत यांनी सांगितले. गत वर्षभरात १३ विविध प्रकारांत मिळून ३ हजार ६३५ तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. पैकी ३ हजार ५५७ तक्रारींचे निराकरण करून ग्राहकांना न्याय देण्यात आला. गत दोन ते तीन वर्षांत आॅनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढत आहे. याबरोबरच ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढत असल्याबाबत संत म्हणाल्या, आॅनलाईन खरेदी केली तरी ग्राहकांना ग्राहकमंचात दाद मागता येते. न्यायही मिळू शकतो. मात्र ग्राहकांकडे वस्तू खरेदी केल्याची परिपूर्ण माहिती, पावत्या, संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक तसेच इतर पुरावा घेऊन ग्राहकमंचात तक्रार केल्यास न्याय मिळण्यास निश्चित मदत मिळू शकते. आॅनलाईन खरेदी केली आता तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न ग्राहकांना पडत असतो. मात्र आॅनलाईन तक्रारीही ग्राहकमंचा निकाली निघू शकतात. संत यांनी सांगितले की, शक्यतो कॅश आॅन डिलेव्हरीच करावी, आलेले पार्सल कुरिअरमन समक्षच फोडावे.कोणतीही वस्तू खरेदी केल्यावर तिची पक्की पावती ग्राहकांनी मागावी. तो त्यांचा हक्क आहे. मात्र कर जास्त लागतो म्हणून ग्राहक पक्की पावती मागण्याचे टाळतात. ४सोने असो अथवा एखादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पक्की पावती मागितल्यास त्याचा फायदा ग्राहकांनाच होत असल्याचे ग्राहक मंचच्या अध्यक्षा संत म्हणाल्या. ४त्याचबरोबर तुम्हाला लॉटरी लागली, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले. तुमचा एटीएम क्रमांक द्या आदी अफावांवर ग्राहकांनी अजिबात विश्वास ठेवू नये. त्या पूर्ण फसव्या असतात.