शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

‘एक्झिट पोल’मुळे भाजपात आनंद

By admin | Updated: May 13, 2014 00:59 IST

औरंगाबाद : मतदानाचे सर्व टप्पे संपताच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी निकालाचे अंदाज (एक्झिट पोल) घोषित करणे सुरू करताच भाजपाच्या गोटात आनंद पसरला.

औरंगाबाद : मतदानाचे सर्व टप्पे संपताच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी निकालाचे अंदाज (एक्झिट पोल) घोषित करणे सुरू करताच भाजपाच्या गोटात आनंद पसरला. तर काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी चार दिवस थांबा व थेट निकालच ऐका, असा सावध पवित्रा घेतला. ९ व्या टप्प्यातील मतदान सहा वाजता संपले व दूरचित्रवाण्यांनी आपापल्या पाहणीचे अंदाज घोषित करणे सुरू केले. या अंदाजामध्ये सर्वच चॅनल्सने ‘मोदी लहर’वर शिक्कामोर्तब करून भाजपाप्रणीत आघाडीला २९० जागांपर्यंत पोहोचविले. तर काँग्रेसला १०० जागांच्या आतच रोखले. त्यामुळे एनडीएच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. अपेक्षितच होते केंद्रात सत्ता परिवर्तन अपेक्षितच होते. नरेंद्र मोदी यांनी अगदी सुरुवातीलाच हा अंदाज व्यक्त केला होता. तो खरा ठरणार आहे. देशभरात बदलाचे वातावरण होते. त्या वातावरणाला साजेसा निकाल लागणार याबद्दल आम्ही निश्ंिचत आहोत. फक्त भाजपाच्या जागा २७२ हून अधिक येतील, असा आम्हाला विश्वास आहे. शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भाजपा शेवटी हे अंदाजच शेवटी हे अंदाजच आहेत. त्यावर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही. माध्यमांनी सातत्याने वर्तविलेले अंदाज चुकले आहेत. यावेळेसही त्याची पुनरावृत्ती होईल. केशवराव औताडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस त्रिशंकू परिस्थिती होईल माध्यमांनी वर्तविलेले पाहणी अंदाज काहीअंशी बरोबर आहेत. त्यात काँग्रेस आघाडीच्या जागा घटणार हे निश्चित; परंतु भाजपा आघाडीला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. त्यांना बहुमत मिळणार नाही. यूपी, ओरिसा, प. बंगाल, तामिळनाडू आदी राज्यांत प्रादेशिक पक्षांना अधिक जागा मिळणार आहेत, त्यामुळे केंद्रात नवी समीकरणे तयार होऊ शकतात. प्रा. अविनाश डोळस, भारिप-बहुजन महासंघ