शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

जायकवाडी पक्षी अभयारण्यामुळे नागरिकांची उडाली झोप

By admin | Updated: April 22, 2016 00:52 IST

जायकवाडी : जायकवाडी धरण क्षेत्रातील पक्षी अभयारण्यामुळे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणामुळे पुनर्वसित किमान १०० गावे पुन्हा बाधित होणार आहेत.

जायकवाडी : जायकवाडी धरण क्षेत्रातील पक्षी अभयारण्यामुळे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणामुळे पुनर्वसित किमान १०० गावे पुन्हा बाधित होणार आहेत. अभयारण्यासंदर्भातील घोषणा होऊन तीन महिने उलटले असून नागरिकांकडून मागविलेल्या आक्षेपाचे काय झाले, पुढील कारवाई काय व कधी होणार अशी भययुक्त चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. जायकवाडी धरण क्षेत्र परिसराला पक्षी अभयारण्य क्षेत्र लागू करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने १४ जानेवारी २०१६ ला राजपत्रात घोषणा केली आहे. याबाबत नागरिक व शेतकऱ्यांना आक्षेप मांडण्याची संधी देण्यात आली होती. अनेकांनी आपले म्हणणे मांडले आहे. त्यावर काय निर्णय घेण्यात आला, याची काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे नागरिकांची काळजी वाढली आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्य औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यात ३४१.०५ किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. या अभयारण्यातील धरणात ६७ प्रजातीचे मासे असून विविध २३४ जातींचे पक्षी या धरणावर मुक्कामी येतात. जायकवाडी पक्षी अभयारण्याचे सीमा क्षेत्र ० ते ५०० मीटरपर्यंत आखण्यात आले आहे. यामुळे शेतकरी व नागरिक भयभीत झाले असून सध्या गावागावात इको सेन्सेटिव्ह झोनबाबतची चर्चा चालू आहे. शेतकऱ्यांना आपल्या जमिनी जातात की काय? हा प्रश्न भेडसावत आहे. जायकवाडी धरण तयार होताना परिसरातील १२५ गावातील शेतकऱ्यांच्या लाखो एकर शेतजमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्यातच पक्षी अभयारण्य क्षेत्र लागू करण्याच्या हालचालीमुळे पुन्हा शेतकऱ्यांसह नागरिक मानसिक ताणाखाली आले आहेत. धरणग्रस्त कुटुंबे आजही शासकीय योजनांपासून वंचित असतानाच त्यांच्या डोक्यावर इको झोनसारखा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. संबंधित वन विभागाने इको सेन्सेटीव्ह झोन कसा असणार, याबाबत जनतेला अद्यापही समजून सांगितले नसल्याने नागरिकांचा संभ्रम वाढला आहे.