शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी पक्षी अभयारण्यामुळे नागरिकांची उडाली झोप

By admin | Updated: April 22, 2016 00:52 IST

जायकवाडी : जायकवाडी धरण क्षेत्रातील पक्षी अभयारण्यामुळे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणामुळे पुनर्वसित किमान १०० गावे पुन्हा बाधित होणार आहेत.

जायकवाडी : जायकवाडी धरण क्षेत्रातील पक्षी अभयारण्यामुळे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणामुळे पुनर्वसित किमान १०० गावे पुन्हा बाधित होणार आहेत. अभयारण्यासंदर्भातील घोषणा होऊन तीन महिने उलटले असून नागरिकांकडून मागविलेल्या आक्षेपाचे काय झाले, पुढील कारवाई काय व कधी होणार अशी भययुक्त चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. जायकवाडी धरण क्षेत्र परिसराला पक्षी अभयारण्य क्षेत्र लागू करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने १४ जानेवारी २०१६ ला राजपत्रात घोषणा केली आहे. याबाबत नागरिक व शेतकऱ्यांना आक्षेप मांडण्याची संधी देण्यात आली होती. अनेकांनी आपले म्हणणे मांडले आहे. त्यावर काय निर्णय घेण्यात आला, याची काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे नागरिकांची काळजी वाढली आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्य औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यात ३४१.०५ किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. या अभयारण्यातील धरणात ६७ प्रजातीचे मासे असून विविध २३४ जातींचे पक्षी या धरणावर मुक्कामी येतात. जायकवाडी पक्षी अभयारण्याचे सीमा क्षेत्र ० ते ५०० मीटरपर्यंत आखण्यात आले आहे. यामुळे शेतकरी व नागरिक भयभीत झाले असून सध्या गावागावात इको सेन्सेटिव्ह झोनबाबतची चर्चा चालू आहे. शेतकऱ्यांना आपल्या जमिनी जातात की काय? हा प्रश्न भेडसावत आहे. जायकवाडी धरण तयार होताना परिसरातील १२५ गावातील शेतकऱ्यांच्या लाखो एकर शेतजमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्यातच पक्षी अभयारण्य क्षेत्र लागू करण्याच्या हालचालीमुळे पुन्हा शेतकऱ्यांसह नागरिक मानसिक ताणाखाली आले आहेत. धरणग्रस्त कुटुंबे आजही शासकीय योजनांपासून वंचित असतानाच त्यांच्या डोक्यावर इको झोनसारखा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. संबंधित वन विभागाने इको सेन्सेटीव्ह झोन कसा असणार, याबाबत जनतेला अद्यापही समजून सांगितले नसल्याने नागरिकांचा संभ्रम वाढला आहे.