शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

जायकवाडी पक्षी अभयारण्यामुळे नागरिकांची उडाली झोप

By admin | Updated: April 22, 2016 00:52 IST

जायकवाडी : जायकवाडी धरण क्षेत्रातील पक्षी अभयारण्यामुळे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणामुळे पुनर्वसित किमान १०० गावे पुन्हा बाधित होणार आहेत.

जायकवाडी : जायकवाडी धरण क्षेत्रातील पक्षी अभयारण्यामुळे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणामुळे पुनर्वसित किमान १०० गावे पुन्हा बाधित होणार आहेत. अभयारण्यासंदर्भातील घोषणा होऊन तीन महिने उलटले असून नागरिकांकडून मागविलेल्या आक्षेपाचे काय झाले, पुढील कारवाई काय व कधी होणार अशी भययुक्त चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. जायकवाडी धरण क्षेत्र परिसराला पक्षी अभयारण्य क्षेत्र लागू करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने १४ जानेवारी २०१६ ला राजपत्रात घोषणा केली आहे. याबाबत नागरिक व शेतकऱ्यांना आक्षेप मांडण्याची संधी देण्यात आली होती. अनेकांनी आपले म्हणणे मांडले आहे. त्यावर काय निर्णय घेण्यात आला, याची काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे नागरिकांची काळजी वाढली आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्य औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यात ३४१.०५ किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. या अभयारण्यातील धरणात ६७ प्रजातीचे मासे असून विविध २३४ जातींचे पक्षी या धरणावर मुक्कामी येतात. जायकवाडी पक्षी अभयारण्याचे सीमा क्षेत्र ० ते ५०० मीटरपर्यंत आखण्यात आले आहे. यामुळे शेतकरी व नागरिक भयभीत झाले असून सध्या गावागावात इको सेन्सेटिव्ह झोनबाबतची चर्चा चालू आहे. शेतकऱ्यांना आपल्या जमिनी जातात की काय? हा प्रश्न भेडसावत आहे. जायकवाडी धरण तयार होताना परिसरातील १२५ गावातील शेतकऱ्यांच्या लाखो एकर शेतजमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्यातच पक्षी अभयारण्य क्षेत्र लागू करण्याच्या हालचालीमुळे पुन्हा शेतकऱ्यांसह नागरिक मानसिक ताणाखाली आले आहेत. धरणग्रस्त कुटुंबे आजही शासकीय योजनांपासून वंचित असतानाच त्यांच्या डोक्यावर इको झोनसारखा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. संबंधित वन विभागाने इको सेन्सेटीव्ह झोन कसा असणार, याबाबत जनतेला अद्यापही समजून सांगितले नसल्याने नागरिकांचा संभ्रम वाढला आहे.