शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

समाजाला विवेकी बनवणे आवश्यक

By admin | Updated: December 27, 2014 00:47 IST

औरंगाबाद : प्रत्येकाने विवेक, बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैज्ञानिकतेचा स्वीकार केला पाहिजे’ असे प्रतिपादन प्रा. श्याम मानव यांनी केले.

औरंगाबाद : ‘महाराष्ट्राला समाजसुधारक आणि पुरोगामी संतांची मोठी परंपरा आहे. ती स्पष्ट करीत प्रत्येकाने विवेक, बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैज्ञानिकतेचा स्वीकार आणि प्रचार, प्रसार केला पाहिजे’ असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व राज्य शासनाच्या जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीचे प्रमुख प्रा. श्याम मानव यांनी केले. राज्य शासनाच्या समाजकल्याण व सामाजिक न्याय विभागातर्फे जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचार, प्रसारासाठी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, सहायक आयुक्त जे. एस. एम. शेख, समाजकल्याण अधिकारी समाधान इंगळे, महिला व बालकल्याण सभापती शीला चव्हाण, विजय जाधव, जितेंद्र वळवी, प्रवीण गांगुर्डे, शुद्धोधन तायडे उपस्थित होते. यावेळी आमंत्रित असणारे महत्त्वाचे लोकप्रतिनिधी मात्र गैरहजर राहिले. प्रा. मानव म्हणाले, ‘प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या तंत्रयुगातही महाराष्ट्रात नरबळींचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते आहे. हा महाराष्ट्र शाहू-फुले आंबेडकरांचा खरोखर आहे का, असा प्रश्न पडतो. इथल्या वारकरी संप्रदायानेही समता आणि वैज्ञानिकता सांगितली. चातुर्वर्ण्याचा दाह कमी केला. लहानपणी अनेक अंधश्रद्धा बाळगणारा मी पुढे समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या सहवासात आलो. केरळचे विज्ञानवादी अब्राहम कोवूर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर पडला. अंधश्रद्धेला विरोध म्हणजे देवा-धर्मावर टीका, असा अपप्रचार अनेकांनी केला. तो पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचेच या कायद्याने सिद्ध केले आहे.भारतात अध्यात्माच्याच नावावर बाबा-बुवा फसवणूक करतात. मात्र कुठलेच अध्यात्म विज्ञानाला ओलांडणारे नसते. कायद्याद्वारे दाखल झालेल्या गुन्ह्यांमधून बुवाबाजीला स्त्रियाच सर्वाधिक बळी पडत असल्याचे समोर आले आहे. स्त्रियांनी सक्षम बनत असे प्रकार उघडकीला आणण्यात पुढाकार घ्यायला हवा. हा कायदा समजावून सांगण्यास केवळ शासन व अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुरेशी नाही. संविधान व लोकशाहीला सक्षम करणारा हा कायदा सामान्यांपर्यंत पोहोचवत गैरसमज दूर करणे हे सर्व सुशिक्षित व सुजाण लोकांचे कर्तव्य आहे.