शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांना नगरविकास विभागाची परवानगी घेणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:02 IST

औरंगाबाद : महापालिकेतील वेगवेगळ्या पदांवर प्रतिनियुक्ती पद्धतीने अधिकारी तीन वर्षांसाठी येतात. यापुढे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला राज्याच्या नगरविकास ...

औरंगाबाद : महापालिकेतील वेगवेगळ्या पदांवर प्रतिनियुक्ती पद्धतीने अधिकारी तीन वर्षांसाठी येतात. यापुढे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला राज्याच्या नगरविकास विभागाची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. नगरविकास विभागाची परवानगी नसलेल्या अधिकाऱ्यांना रुजू करू नये, असे आदेश नगरविकास विभागाने काढले आहेत.

औरंगाबाद महापालिकेला नगरविकास विभागाकडून नुकतेच आदेश प्राप्त झाले आहेत. महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. मागील १५ वर्षांमध्ये महापालिकेने अधिकारी, कर्मचारी भरती केलेली नाही. महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी हळूहळू निवृत्त झाले. त्यांच्या रिक्त पदावर शासनाकडून अधिकारी मागविण्यात आले. महापालिकेतील निम्मे कामकाज प्रतिनियुक्तीवरील अधिकारी सांभाळत आहेत. आणखी तीन ते चार महिन्यांनंतर महापालिकेतील मोठ्या पदावर असलेले अधिकारी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागेवर पदोन्नतीने रिक्त पद भरण्यासाठी महापालिकेकडे अधिकारी नाहीत. त्यामुळे भविष्यात महापालिकेला सार्वजनिक बांधकाम आणि इतर विभागांतून अधिकारी प्रतिनियुक्तीवर आणावे लागतील. यापूर्वी महापालिकेत प्रतिनियुक्तीवर लेखा कोषागार, महसूल, नगरपरिषद या विभागातील अधिकारी येत होते. आता नगरविकास विभागाने प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांवर काही बंधने टाकली आहेत. नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी यासंबंधी काढलेल्या आदेशात नमूद केले की, राज्य शासनाच्या अन्य प्रशासकीय विभागामार्फत महापालिकांमधील प्रशासकीय पदांवर परस्पर नियुक्त्या करण्यात आल्याचे व संबंधित अधिकारीही परस्पर महापालिकांमध्ये रुजू झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अधिनियमातील तरतुदी, प्रतिनियुक्ती धोरण या बाबींशी विसंगत आहे. त्यामुळे संवर्ग व्यवस्थापनात अडचणी निर्माण होत असल्याचेदेखील निदर्शनास आले आहे. महापालिकांमधील प्रतिनियुक्तीच्या पदांवर नगरविकास विभागाव्यतिरिक्त अन्य प्रशासकीय विभागांमार्फत परस्पर नियुक्त्या होऊन संबंधित अधिकारी महापालिकेमध्ये रुजू होण्यासाठी आल्यास अशा अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत नगरविकास विभागाचे स्वयंस्पष्ट आदेश असल्याखेरीज रुजू करून घेऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.