शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

इस्लामचा दहशतवादाशी संबंध नाही - कमरूजमा आजमी

By admin | Updated: May 8, 2014 23:43 IST

जालना : दहशतवादामुळे मुस्लिम समाजसुद्धा प्रचंड त्रस्त असून दहशतवादाचा इस्लाम धर्माशी काहीही संबंध नाही.

 जालना : दहशतवादामुळे मुस्लिम समाजसुद्धा प्रचंड त्रस्त असून दहशतवादाचा इस्लाम धर्माशी काहीही संबंध नाही. काही लोक राजकीय फायद्यासाठी दहशतवादाशी इस्लामचा संबंध जोडत असल्याचा आरोप जागतिक इस्लामी मिशनचे सचिव मौलाना कमरूजमा आजमी यांनी केला. येथील राजाबाग सवार दर्गा उरूस निमित्त प्रवचनासाठी आजमी मंगळवारी जालना येथे आले होते. पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, मुस्लिम देशांमध्ये काही लोक दहशतवादाचा आधार घेऊन राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना अमेरिका मदत करीत असल्याचा आरोपही आजमी यांनी केला. दहशतवाद वाढण्याचे कारण शोधले पाहिजे, असे सांगून आजमी म्हणाले की, इस्लामची शिकवण शांतता, बंधुभाव, मानवता ही आहे. त्याचा प्रचार व प्रसार आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याचा आपला उद्देश आहे. आपल्या या कामाची दखल इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हीड कॅमरेन यांनी घेतली. जागतिक पातळीवरील दहशतवादाबाबत त्यांनी आपल्यासमवेत चर्चा केली, असे आजमी यांनी सांगितले. देशात मुस्लिम समाजाला भाजपाची विशेषत: नरेंद्र मोदींची भीती घातली जात आहे, याविषयी आजमी म्हणाले, मुस्लिम समाजाने भाजपाची किंवा मोदींची भीती बाळगण्याचे कारण नाही. देशात लोकशाही आहे. जगभरात सर्वाधिक लोकशाहीचे अधिकार भारतातच आहेत, असेही ते म्हणाले. भारतीय लोकशाहीची त्यांनी प्रशंसा केली. भारतातील मुस्लिम समाजाला योग्य दिशा देण्यासाठी अराजकीय संघटनेची गरज आहे. समाजातील युवकांनी त्या दिशेने पावले उचलावीत, असे आवाहनही आजमी यांनी केले. यावेळी सय्यद जमील रजवी, फेरोज बागवान आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)