शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

आयएओ, निर्मलसाठी जि.प. सरसावली

By admin | Updated: September 20, 2014 00:04 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेकडून निर्मलग्राम अभियानासह आयएसओ व सीएससी उपक्रमात ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवून प्रशासकीय गतिमानतेला चालना देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

हिंगोली : जिल्हा परिषदेकडून निर्मलग्राम अभियानासह आयएसओ व सीएससी उपक्रमात ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवून प्रशासकीय गतिमानतेला चालना देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी उपक्रमनिहाय प्रत्येक तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.निर्मलग्राम गाव होण्यासाठी काही गावांत थोडक्या लोकांनी शौचालय बांधले नसल्याने अडचण येत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील अशी दहा गावे निवडून त्यांना प्राधान्याने काम पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यासाठी पाचही तालुक्यात प्रत्येकी दहा याप्रमाणे पन्नास ग्रामपंचायतींची निवड केली आहे. त्यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट देण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी दिली.त्याचबरोबर वरीलप्रमाणेच प्रत्येक तालुक्यातील १0 ग्रामपंचायतींना आयसओ मिळण्यासाठी व सीएससी हा उपक्रम राबविण्यासाठी निवडले आहे. आयएसओसाठी अभिलेखे अद्ययावत ठेवण्यासह इतर सर्व बाबींकडे लक्ष दिले जाणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींसाठी शिबीर घेतले जाणार आहे. तांत्रिकदृष्ट्या कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जेथे कनेक्टिव्हीची अडचण आहे, तेथे काय उपाययोजता येतील, याबाबतही विचारविमर्श सुरू असल्याचे जाधव म्हणाले. यातील ग्रामपंचायतींची निवड करताना या बाबींची पडताळणी अगोदरच करण्यात आली असली तरी भविष्यात कोणतीच अडचण न येण्यासाठी ही आखणी केली आहे. सीएससीचे काम संग्राम कक्षांतर्गत चालणार आहे. त्यातच नवे फायनान्सर इन्क्लुजर देण्याचे दीडशेचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)