शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

सप्टेंबर अखेरपर्यंत ‘इंटरचेंज’ची कामे होतील पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:05 IST

समृद्धी महामार्ग : शिर्डीपर्यंत वाहतूक सुरू करण्यासाठी विदर्भातील कामांचा अडथळा - विजय सरवदे औरंगाबाद : जिल्ह्यातील ११२ किलोमीटर लांब ...

समृद्धी महामार्ग : शिर्डीपर्यंत वाहतूक सुरू करण्यासाठी विदर्भातील कामांचा अडथळा

- विजय सरवदे

औरंगाबाद : जिल्ह्यातील ११२ किलोमीटर लांब असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाने आता गती घेतली आहे. या महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव, जांबरगाव व शेंद्रा एमआयडीसी या पाचपैकी शेंद्रा येथील ‘इंटरचेंज’चे काम सोडले, तर उर्वरित चार ठिकाणी ‘इंटरचेंज’ची कामे सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंके यांनी व्यक्त केला आहे.

तथापि, या महामार्गावरून पहिल्या टप्प्यात ‘नागपूर ते शिर्डी’ मार्गे औरंगाबाद अशी वाहतूक सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. मात्र, नागपूर व विदर्भातील काही ठिकाणी कामे सुरूच असल्यामुळे तूर्तास तरी या महामार्गावरून वाहतूक सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

औरंगाबाद जिल्ह्यात एल ॲण्ड टी व मेगा इंजिनिअरिंग या दोन कंत्राटदार संस्थांनी फेब्रुवारी २०१९ पासून कामाला सुरुवात केली. निविदेनुसार या दोन्ही संस्थांना कामे पूर्ण करण्याची मुदत सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे. त्यानुसार एल अँड टी या कंत्राटदार संस्थेची गंगापूर व वैजापूर तालुक्यातील महामार्गाची संपूर्ण कामे सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील, तर तुलनेने मेगा इंजिनिअरिंगची कामे डिसेंबरअखेरपर्यंत चालतील. कोरोना संसर्गामुळे मागील वर्षापासून या महामार्गाची कामे प्रभावित झाली आहेत. परप्रांतीय मजुरांचा मोठा गट मोठ्या प्रमाणात गावी गेला होता. त्यामुळे कामाची गती मंदावली होती. सध्या ६० टक्के परप्रांतीय मजूर परतले असून, आता कामाने गती घेतली आहे.

या सहापदरी महामार्गावर रस्त्याची बहुतांशी कामे पूर्ण झाली असून, हडस पिंपळगाव, जांबरगाव, माळीवाडा आणि सावंगी इंटरचेंज, तर लासूर स्टेशनजवळ रेल्वे ओव्हर ब्रीजचे काम प्रगतिपथावर आहे. ही कामे सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत इंटरचेंजसाठी भूसंपादन रखडले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेथून पुढे इंटरचेंज उभारण्यासाठी चार महिन्यांचा अवधी लागणार आहे. या महामार्गावर औरंगाबाद तालुक्यातील पोखरी शिवारात २९० मीटर लांबीचा बोगदा (भुयारी मार्ग) तयार करण्यात येत आहे. दोन्ही बाजूने आरपार डोंगर कोरण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या बोगद्याच्या आतील बाजूचे मजबुतीकरणाचे (लाईनिंग) काम हाती घेण्यात आले आहे. हे बोगदेही सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

चौकट......

महामार्गावर पंप, चार्जिंग स्टेशन

या महामार्गावर औरंगाबादेतील ५ इंटरचेंजसह राज्यात २४ इंटरचेंज आहेत. प्रत्येक इंटरचेंजच्या ठिकाणी पेट्रोल पंप, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. या महामार्गावर दर २०० किलोमीटर अंतरावर एक फूड मॉल उभारले जाणार आहे. यासंदर्भात राज्यस्तरावर नियोजन केले जात आहे, असे ‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले.