शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

३१ मार्च २०१५ पर्यंत एकात्मिक राज्य जल आराखडा तयार होणार!

By admin | Updated: January 20, 2015 01:28 IST

औरंगाबाद : येत्या ३१ मार्च २०१५ पर्यंत एकात्मिक राज्य जल आराखडा तयार करावा, त्यासाठी जल मंडळाच्या बैठका वारंवार व्हाव्यात

औरंगाबाद : येत्या ३१ मार्च २०१५ पर्यंत एकात्मिक राज्य जल आराखडा तयार करावा, त्यासाठी जल मंडळाच्या बैठका वारंवार व्हाव्यात, मुख्य सचिवांनी याबाबतचे गांभीर्य सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्यावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत ठरविण्यात आले असल्याची माहिती आज येथे एका पत्रपरिषदेत मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समितीचे संयोजक प्रदीप पुरंदरे यांनी एका पत्रपरिषदेत सांगितले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ अन्वये जल परिषदेची स्थापना २००५ साली झाली. मुख्यमंत्री तिचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत; पण गेल्या दहा वर्षांत परिषदेची एकही बैठक घेण्यात आली नव्हती. परिषद कार्यरत नव्हती. राज्य जल परिषद कार्यरत करावी व तिची पहिली बैठक ताबडतोब घेण्यात यावी, अशी मागणी मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समितीने केली होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेतली आणि अलीकडेच १७ जानेवारी रोजी राज्य जल परिषदेची पहिली बैठक मुंबईत पार पडली. त्यावेळी समितीचे सदस्य असलेले मंत्री व संबंधित अधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा जायकवाडीस लागू नाही आणि त्या कायद्याने डेलिनिएशन केल्याशिवाय जायकवाडीस कलम क्र. १२ (६) (ग) प्रमाणे पाणी देता येणार नाही, अशा अर्थाचे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणचे मूळ प्रतिज्ञापत्र कसे चूक आहे आणि त्या भूमिकेमुळे कशी हास्यास्पद परिस्थिती राज्यात निर्माण होईल, हे आपण दाखवून दिले. खुद्द मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी हा मुद्दा उचलून धरला, याकडे लक्ष वेधून पुरंदरे यांनी आणखी सांगितले की, परिणामी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणचे अध्यक्ष बुद्धिराजा यांची पूर्वीची भूमिका चूक होती. आता ती भूमिका नाही, असा खुलासा केला. म.ज.नि.प्रा. कायदा जायकवाडीलाच नव्हे, तर सर्व महाराष्ट्राला लागू आहे. नदीखोरे स्तरावरील पाण्याचे समन्यायी वाटप आणि एमएमआयएसएफ कायदा याचा काहीही संबंध नाही.सिंचनविषयक विविध कायद्यांबाबतच्या सर्व औपचारिक प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला, अशी माहिती त्यांनी दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात पुरंदरे यांनी, केळकर ही प्रवृत्ती आहे. त्यांच्या मताला आज महत्त्व आहे, या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. या पत्रपरिषदेस साथी अण्णा खंदारे, भाऊ शिंदे, सुखदेव बन आदींची उपस्थिती होती.