एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळमुंबई पोलिसांत भरती होऊन स्वत:च्या पायावर उभा टाकण्याचे स्वप्न रंगविणारा शिरूर अनंतपाळ येथील ‘तो’ युवक मेंदूज्वराने ग्रासल्याने पोलिस भरतीऐवजी आयसीयुत भरती झाला असून, त्याच्यवर अद्यापि, उपचार सुरु असल्याचे त्याला आयसीयुत दाखल करणारे डॉ़ सुनील हंगरगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़मुंबई पोलिसांत भरती होण्यासाठी प्रवेशपत्र प्राप्त झाल्याने शिरूर अनंतपाळ येथील युवक राजेश्वर दगडू मोटे यांस मनस्वी आनंद झाला आहे आणि भरतीसाठी तो ६ जूनला मुंबई नायगाव पोलिस मुख्यालयात दाखल झाला़ भरती प्रक्रिये दरम्यान, त्याची शारीरिक चाचणी, धावणे, कागदपत्र तपासणी, छाती, उंची, वजन सर्व प्रकारच्या चाचण्या झाल्या़ त्यामुळे त्याच्या आशा पल्लवीत झाल्या आणि तो मुंबईतच उपलब्ध परिस्थितीत मैदानावर मुक्कामास राहू लागला़ परंतु तेथे त्याला तापाने अचानक घेरले़ तरीही तो जिद्द बाळगून खाजगीत तात्पुरता औषधोपचार घेऊन राहण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याचा ताप असह्य झाल्याने त्याने थेट शिरूर अनंतपाळ गाठले आणि डॉ़ सुनील हंगरगे यांच्याकडे उपचारासाठी दाखल झाला असता त्याला मेंदूज्वर झाल्याचे डॉ़ हंगरगे यांच्या लक्षात आले़ त्यांनी आपत्कालीन रूग्णवाहिकेद्वारे लातूर येथील खाजगी दवाखान्यातील आयसीयुत भरती केले़ परिणामी खाजगी दवाखान्यातील आयसीयुत भरती होऊन उपचार घेत आहे़ उपचारासाठी १३ जूनपासून आजपर्यंत जवळपास २० हजारापर्यंत खर्च झाला असल्याचे व्ही़डी़हंगरगे यांनी सांगितले़ उघड्यावर झोपल्याने झाला जंतू संसर्गया घडलेल्या घटनेबाबत डॉ़ सुनील हंगरगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, भरती दरम्यान समुद्रकिनारी उघड्यावर झोपल्याने जंतू संसर्ग होऊन ताप मेंदूपर्यंत पोहचला आणि राजेश्वर दगडू मोटेला मेंदूज्वर झाला़ परिणामी त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले़ तेथेही प्रभावी उपचार न झाल्याने लातूर येथील एका खाजगी रूग्णालया पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले़
पोलिस भरतीऐवजी ‘तो’ झाला आयसीयूत भरती
By admin | Updated: June 16, 2014 01:15 IST