शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

गुंठेवारीची महालेखा परीक्षकांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2017 00:31 IST

औरंगाबाद : अनधिकृत वसाहती अधिकृत करण्यासाठी राज्य शासनाने २००० मध्ये गुंठेवारी कायदा अस्तित्वात आणला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अनधिकृत वसाहती अधिकृत करण्यासाठी राज्य शासनाने २००० मध्ये गुंठेवारी कायदा अस्तित्वात आणला. या कायद्याचा आधार घेऊन महापालिकेने तब्बल १७ हजारांहून अधिक मालमत्ता अधिकृत केल्या. हजारो खुल्या जागांना गुंठेवारी कायद्यानुसार बांधकाम परवानगी देण्यात आली. या संपूर्ण कारभाराची कसून चौकशी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी नागपूरच्या महालेखाकार कार्यालयातील सहा अधिकारी व कर्मचारी सध्या मनपात दाखल झाले आहेत. मागील काही वर्षांमध्ये औरंगाबाद शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वसाहती निर्माण झाल्या. या वसाहतींना मूलभूत सोयी- सुविधा देण्याचे दायित्व महापालिकेवर येऊन ठेपले. ५० पेक्षा अधिक वसाहती २००० मध्ये तयार झाल्या होत्या. याचदरम्यान, शासनाने गुंठेवारी कायदा अंमलात आणला. गुंठेवारी शुल्क भरून नागरिकांनी आपल्या मालमत्ता नियमित करून घ्याव्यात हा त्यामागचा उद्देश होता. औरंगाबाद शहरात या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. ६० हजार मालमत्तांपैकी फक्त १७ हजार मालमत्ताच नियमित करण्यात आल्या. मागील १७ वर्षांमध्ये मनपाला गुंठेवारीची शंभर टक्के अंमलबजावणी न करता आल्याने गुंठेवारीतील मालमत्ता नियमित करून देण्याचे काम थांबविण्यात आले. राजकीय मंडळींनी परत प्रशासनावर दबाव टाकून आणखी तीन महिने या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, गुंठेवारीतील कारभाराची आजपर्यंत कोणतीच चौकशी करण्यात आली नाही. राज्य शासनाने औरंगाबाद शहरातील गुंठेवारीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी नागपूर येथील महालेखा परीक्षक कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांचे एक पथक औरंगाबादेत पाठविले आहे. वॉर्ड कार्यालयांतर्गत गुंठेवारीत नियमित करण्यात आलेल्या कामांची पथक तपासणी करणार आहे. मागील दोन दिवसांपासून या पथकाने कामही सुरू केले आहे. या लेखा परीक्षणाचा अहवालही शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.वसाहतींची पाहणी करणारनागपूरहून आलेले पथक वॉर्ड कार्यालयात गुंठेवारीच्या कामाची बारकाईने पाहणी करीत आहे. मनपाने कोणत्या वसाहती नियमित केल्या, त्या वसाहतींचीही पाहणी पथक करणार आहे.