शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रकरणात चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:02 IST

विकास राऊत लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१मधील भूसंपादनात १०० कोटी रुपयांचा ...

विकास राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१मधील भूसंपादनात १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. या तक्रारीत तथ्य आहे की नाही, यासाठी आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. एनएच २११ आणि एनएच ३६१साठी सुमारे २,५०० कोटी रुपयांतून भूसंपादन प्रक्रिया होत आहे. राष्ट्रीय महामार्ग २११ची भूसंपादन प्रक्रिया जवळपास संपली आहे.

मराठवाड्यात राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात घोटाळा झाल्याच्या तक्रारींची मालिका सध्या सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग २११ सोलापूर - बीड - औरंगाबाद - धुळे या महामार्गाच्या भूसंपादनात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी सुरू आहे. मध्यंतरी औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेची जमीन हडपण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. तत्पूर्वी राष्ट्रीय महामार्ग २११मध्ये सुमारे १५० कोटींच्या आसपास रक्कम महामार्गालगत जमिनी दाखवून वाटप करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले. या सगळ्या प्रकरणांची सध्या चौकशी सुरू केली आहे.

नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग ३६१मध्ये भूसंपादनाचा मोबदला ४४० कोटींपर्यंत देण्यात आला असून, १०० कोटींचा मोबदला चुकीच्या पद्धतीने आणि शासकीय जमिनींच्या मोबदल्यात देण्यात आल्याची तक्रार शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार यांनी विभागीय आयुक्तांकडे पुराव्यानिशी केली आहे. या सगळ्या प्रकरणामुळे तेथील उपविभागीय अधिकारी आणि भूसंपादन प्रक्रियेतील यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ९९८ कोटी रुपये एकूण भूसंपादन मोबदला असून, नांदेड - अर्धापूरमधील २५ गावांमधून हा महामार्ग जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने भूसंपादन निवाडे आणि सुनावणी बंद होती. मात्र, असे असताना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावण्या झाल्या. लॉकडाऊनचा गैरफायदा घेत शासकीय जमिनी खासगी मालकीत दाखवून मोबदला देण्यात आल्याची तक्रार आहे.

चौकट..

विभागीय आयुक्तांची माहिती अशी

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले, या तक्रारीप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती जे सत्य असेल ते समोर येईल.

एनएच २११ प्रकरणात सुरू आहे चौकशी

राष्ट्रीय महामार्ग २११मध्ये महामार्गालगत जमिनी दाखवून १४० कोटींहून अधिक रक्कम वाटल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर आयुक्तांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे.