बीड : मग्रारोहयो (महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना) कामांत झालेल्या अनियमिततेची जिल्ह्याबाहेरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आ. विनायक मेटे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली.यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष दिलीप गोरे, अॅड. राहुल मस्के, सुहास पाटील, डॉ. रमेश पानसंबळ, शेख निजाम आदी उपस्थित होते. यावेळी मेटे यांनी क्षीरसागरांच्या ताब्यात असलेल्या नगवण राजुरी, नाळवंडी, बेलुरा, ईट, वांगी, शिवणी या ग्रामपंचायतींमध्येही रोहयोची कोट्यवधी रुपयांची कामे झाली; परंतु तेथे मात्र, कारवाईस ढिल दिली जात असल्याचा आरोप केला. बीड पालिकेच्या विशेष लेखापरीक्षणाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.संत गाडगे बाबा यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याचा संदर्भ देतानाच एवढे एक काम तरी चांगले केले, अशी कोपरखळी त्यांनी मारली. छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळा अनावरणाला मात्र पालिका विलंब करत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. शाहू महाराजांचा पुतळा आणला आहे; परंतु तो मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठेवला आहे. सामाजिक न्यायाची भूमिका घेणाऱ्या शाहू महाराजांची ही अवहेलना नाही का? असा सवाल त्यांनी केला. पुतळ्यासाठी आरक्षित भूखंड बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोपही करुन २६ जूनपर्यंत पुतळ्याचे अनावरण न केल्यास शिवसंग्राम ते करेल, असा इशाराही त्यांनी दिला. पोलीस, फौजदार व स्पर्धा परीक्षेच्या वयोमर्यादेची मागणी दोन वर्षापूर्वी केली होती, तनुसार आता पोलिसांसाठी वयोमर्यादा १५ वरुन २८, फौजदारांसाठी २८ वरुन ३३ व स्पर्धा परीेक्षेसाठी ३३ वरुन ३८ केली आहे. याचा फायदा खुल्याप्रवर्गासह सर्वच प्रवर्गातील बेरोजगारांना होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.मे मध्ये शिवस्मारकाचे भूमिपूजनमुंबईतील अरबी समुद्रात होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मे महिन्यात होत आहे. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. आराखडा तयार असून या कामासाठीच्या कार्यालयाचे उद्घाटन ११ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीती होईल, असेही आ. मेटे म्हणाले. (प्रतिनिधी)
‘रोहयो गैरव्यवहाराची चौकशी करा’
By admin | Updated: April 4, 2016 00:40 IST