शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

व्यवस्थेचे निष्पाप बळी ; हादरले आसमंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:17 IST

थेरबन (ता. भोकर) येथील प्रेमीयुगुल पुजा दासरे-वर्षेवार (वय २२) व गोविंद कºहाळे (२५) यांचे प्रेम जुळले. पूजाचा दोष इतकाच की, तिने निर्मळ प्रेम केले. जात पाहिली नाही. तिने माणसातली माणुसकी पाहिली. गोविंदनेही तेच केले. दोघांनी सुखी जीवनाचा मार्ग निवडला. ते दोघे विजातीय होते व आर्थिक स्थितीने कमकुवत होते.

थेरबन (ता. भोकर) येथील प्रेमीयुगुल पुजा दासरे-वर्षेवार (वय २२) व गोविंद कºहाळे (२५) यांचे प्रेम जुळले. पूजाचा दोष इतकाच की, तिने निर्मळ प्रेम केले. जात पाहिली नाही. तिने माणसातली माणुसकी पाहिली. गोविंदनेही तेच केले. दोघांनी सुखी जीवनाचा मार्ग निवडला. ते दोघे विजातीय होते व आर्थिक स्थितीने कमकुवत होते. नसता ते केव्हाच खुनशी निर्दयी दुनियेच्या नजरेआड झाले असते, याच संधीचा फायदा घेऊन भाऊ दिगंबर दासरे याने डाव साधला. चुलतभाऊ मोहन दासरेच्या मदतीने २३ जुलै रोजी बहिणीस तुझ्या मर्जीप्रमाणे लग्न लाऊन देतो, असे म्हणून विश्वासात घेतले. भोळ्या भाबड्या बहिणीने भावावर विश्वास ठेवला. ज्या भावाच्या हाताला जन्मभर राखी बांधली त्याच हाताने बहिणीचा गळा चिरला. शेवट इथेच संपला नाहीतर निर्ढावलेल्या हाताने बहिणीच्या प्रियकराचाही गळा चिरला. दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले. क्षणात सर्व काही संपले. पुन्हा एकदा एका प्रेमी युगुलाचा अंत झाला. जातीयता हा समाजव्यवस्थेला लागलेला कलंक. त्याने परत डोके वर काढले. जातीयतेचे बंध तोडून नवसमाज निर्मितीसाठी ज्यांनी रक्ताचे पाणी केले त्यांच्या कार्याची नुसती आठवण केल्या गेली; पण प्रत्यक्षात आजही असे प्रकार विचार करायला लावणारे घडत आहेत. ‘जात नाही ती जात’ असे म्हणणाºयांचे खरे ठरले व या उदाहरणावरून स्पष्ट झाले आणि जातीयतेचा बीमोड करणारे कार्य चर्चेत आले. अशीच विचार करायला लावणारी घटना तालुक्यात ५ दिवसानंतर घडली. त्याही घटनेने मानवतेचा अंत पाहिला. मागील खरीप हंगामात शेतकºयांना पीक विम्याचा लाभ बºयापैकी मिळाला. आर्थिक संकटात या योजनेने शेतकºयांना तारले, म्हणून यावर्षीच्या खरीप हंगामातसुद्धा शासनाने खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजना कार्यान्वित केली. त्यानुसार १ ते ३१ जुलैच्या कालावधीत विमा भरणे निश्चित होते, परंतु शासनाने निर्धारित केलेल्या कार्यक्रमात एक नव्हे, अनेक अडचणी आल्या. नियोजनाचा अभाव, तांत्रिक बिघाड, मनुष्यबळ यासारख्या कितीतरी अडचणींमुळे शेतकºयांना पीक विमा भरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. यातच तालुक्यातील दिवशी (बु) चा अल्पभूधारक शेतकरी रामा पोतरे हा किनी येथे बँकेसमोर झालेल्या गर्दीत रेटारेटीमुळे हृदयविकाराने मृत्यू पावला. या एका शेतकºयाच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. विधानसभेत विषय चर्चेला गेला. शासनाने मदत जाहीर केली. रामाचे वृद्ध आईवडील, पत्नी, दोन जुळी ९ वर्षांची लेकरं यांचे शासकीय मदतीवर भागेल काय? एवढ्यावर प्रश्न संपला असे नाही, तर त्या मृत शेतकºयाचा दोष काय? ज्यास अवेळी मरण आले, त्याच्या कुटुंबाने पाहिलेल्या स्वप्नांचे काय?