शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती अनुपलब्ध

By admin | Updated: August 25, 2014 01:39 IST

वडवणी : संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी वडवणी तहसीलमध्ये निराधारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र वडवणी तालुक्यात एकूण किती निराधार आहेत?

वडवणी : संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी वडवणी तहसीलमध्ये निराधारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र वडवणी तालुक्यात एकूण किती निराधार आहेत? याची माहिती तहसीलमध्ये अनुपलब्ध असल्याने संताप व्यक्त होत आहे. तहसीलदारही टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याने माहिती मागायची कोणाकडे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.१३ आॅगस्ट रोजी वडवणी तालुक्यातील कान्हापूर येथील ८० वर्षीय रुक्मीणबाई सूर्यभान सरगर यांना आपले प्राण गमवावे लागले होते तर दोन महिन्यापूर्वी बँकेत आलेल्या पद्मीनबाई जावळे यांचाही बँकेच्या पायऱ्यावरच मृत्यू झाला होता. निराधारांचा गंभीर प्रश्न असतानाही याकडे तहसीलदार मात्र दुर्लक्ष करीत आहेत. वडवणी तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेत किती लाभार्थी आहेत? याची माहिती आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे तहसीलदार एन.जी. झंपलवाड यांनी सांगितले. ही माहिती माझ्याकडे नसते, दुसऱ्यांना विचारा, अशी टोलवाटोलवीची उत्तरेही झंपलवाड देत असल्याने संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या वतीने प्रत्येक निराधार लाभार्थ्याला त्याचे नाव यादीत आले किंवा नाही हे त्याच्या घरी पत्र पाठवून कळविले जाते. मात्र वडवणी तहसीलच्या मनमानी कारभारामुळे असा कुठलाही प्रकार येथे होत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळेच रुक्मीणबाई सरगर यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या दिवशीपासून आजपर्यंत कुठलीही काळजी वडवणी तहसीलच्या वतीने घेतली जात नसल्याचे उघड झाले आहे. तहसीलदार झंपलवाड मात्र निराधारांना ‘वेटींग’वर ठेवून त्यांच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप लाभार्थ्यांतून होत आहे. (वार्ताहर)