शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

ग्रामीण रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या रिक्त पदांची माहिती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:04 IST

औरंगाबाद : राज्यातील ग्रामीण रुग्णालयांमधील डॉक्टरांची किती पदे रिक्त आहेत, ती पदे केव्हा भरणार, याची माहिती ३० सप्टेंबरपर्यंत ...

औरंगाबाद : राज्यातील ग्रामीण रुग्णालयांमधील डॉक्टरांची किती पदे रिक्त आहेत, ती पदे केव्हा भरणार, याची माहिती ३० सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. एम.जी. मेहरे यांनी गुरुवारी राज्य शासनाला दिले. सरकारी वकील अजित कार्लेकर यांनी बाजू मांडली.

खंडपीठाने राज्याच्या ग्रामविकास विभागाला प्रतिवादी करण्याची मुभा याचिकाकर्ता खासदार इम्तियाज जलील यांना देऊन ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला. खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांमधील रिक्त पदे आणि वैद्यकीय सोयीसुविधांचा अभाव यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले.

ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त

राज्यातील बहुतांश ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची पदे रिक्त आहेत, असे निवेदन करून खा. जलील यांनी एक तक्ता सादर करून औरंगाबादलगतच्या १२ तालुक्यांमधील डॉक्टरांच्या रिक्त पदांची माहिती खंडपीठाला दिली. त्यानुसार वैजापूर- १६, सिल्लोड- १२, गंगापूर- १७, कन्नड- ८, पाचोड- ९, खुलताबाद- ४, सोयगाव- ६, पिशोर- ४, फुलंब्री- ५, करमाड- ४, अजिंठा- ३, बिडकीन- ४, देवगाव रंगारी- ४ आणि औरंगाबाद मुख्यालयात ९ अशा १२ तालुका रुग्णालयांत एकूण १०५ डॉक्टर कार्यरत आहेत.

त्यात २८ स्त्रीरोगतज्ज्ञ, १२ बालरोगतज्ज्ञ, ७ भूलतज्ज्ञ, केवळ गंगापूरला एक फिजिशियन, सिल्लोड आणि गंगापूरला प्रत्येकी एक शल्यचिकित्सक, ६ अस्थिरोगतज्ज्ञ, केवळ वैजापूरलाच एक नेत्रतज्ज्ञ केवळ सिल्लोडला एक वैद्यकीय तपासणी तज्ज्ञ (पॅथॉलॉजिस्ट) आणि वरील १२ रुग्णालयांत एकूण ३९ एमबीबीएस डॉक्टर, ७ वैद्यक (पीएसएम) आणि केवळ सोयगावला एक बीएएमएस डॉक्टर कार्यरत आहे.

चौकट........................

तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे घाटीत गर्दी

ग्रामीण रुग्णालयांत पुरेसे तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटीत) रुग्णांची प्रचंड गर्दी असते. ग्रामीण रुग्णालयांत इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. ती भरण्याची जबाबदारी ग्रामविकास विभागाची आहे. त्या विभागाला प्रतिवादी करण्याची मुभा देण्याची विनंती खा. जलील यांनी केली आहे.