शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

उद्योगांनी दिला १२,९०० कोटींचा महसूल

By admin | Updated: May 6, 2016 23:59 IST

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत असणाऱ्या औरंगाबादेतील उद्योगांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल १२,९०० कोटी रुपयांची महसुलाच्या रुपात भर घातली आहे.

औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत असणाऱ्या औरंगाबादेतील उद्योगांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल १२,९०० कोटी रुपयांची महसुलाच्या रुपात भर घातली आहे.गेल्या पाच वर्षांच्या म्हणजे २००८-०९ च्या तुलनेत उद्योगांनी दिलेल्या महसुलात अडीच पट वाढ झाली आहे. २००८-०९ यावर्षी उद्योगांनी ३,५१८ कोटी रुपयांचा अबकारी व सीमा शुल्क कराचा भरणा केला होता. याबरोबरच २३० कोटींचा सेवाकर, ७३८ कोटी रुपयांचा मूल्यवर्धित कर (व्हॅट), ८७८ कोटी रुपयांच्या राज्य उत्पादन शुल्काचा भरणा केला होता. २००९-१० यावर्षी २,८८३ कोटी रुपयांचा अबकारी कर, ८९७ कोटींचा व्हॅट आणि ९४४ कोटींच्या राज्य उत्पादन शुल्कासह ४,९२३ कोटी रुपयांचा भरणा केला होता. २०१०-११ यावर्षी उद्योगांनी ७,१७० कोटी रुपयांचा महसूल दिला होता. ४,३५५ रुपयांचा अबकारी कर, १,२९६ कोटींचा व्हॅट आणि १,३१० कोटी रुपयांचा राज्य उत्पादन शुल्क आदींचा यात समावेश आहे. गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्यात सातत्याने दुष्काळ पडत आहे. शेतीचे उत्पन्न घटल्याने उद्योगांवरच विभागाची अर्थव्यवस्था टिकून आहे. अशा परिस्थितीत महसुलात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. २०११-१२ यावर्षी ९,८०५ कोटी रुपये, २०१२-१३ यावर्षी ११,४७२ कोटी, २०१३-१४ यावर्षी ११,८५९ कोटी, तर २०१४-१५ यावर्षी १२,७५२ कोटींचा महसूल शासनाला मिळवून दिला होता.