शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

उद्योगांनी दिला १२,९०० कोटींचा महसूल

By admin | Updated: May 6, 2016 23:59 IST

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत असणाऱ्या औरंगाबादेतील उद्योगांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल १२,९०० कोटी रुपयांची महसुलाच्या रुपात भर घातली आहे.

औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत असणाऱ्या औरंगाबादेतील उद्योगांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल १२,९०० कोटी रुपयांची महसुलाच्या रुपात भर घातली आहे.गेल्या पाच वर्षांच्या म्हणजे २००८-०९ च्या तुलनेत उद्योगांनी दिलेल्या महसुलात अडीच पट वाढ झाली आहे. २००८-०९ यावर्षी उद्योगांनी ३,५१८ कोटी रुपयांचा अबकारी व सीमा शुल्क कराचा भरणा केला होता. याबरोबरच २३० कोटींचा सेवाकर, ७३८ कोटी रुपयांचा मूल्यवर्धित कर (व्हॅट), ८७८ कोटी रुपयांच्या राज्य उत्पादन शुल्काचा भरणा केला होता. २००९-१० यावर्षी २,८८३ कोटी रुपयांचा अबकारी कर, ८९७ कोटींचा व्हॅट आणि ९४४ कोटींच्या राज्य उत्पादन शुल्कासह ४,९२३ कोटी रुपयांचा भरणा केला होता. २०१०-११ यावर्षी उद्योगांनी ७,१७० कोटी रुपयांचा महसूल दिला होता. ४,३५५ रुपयांचा अबकारी कर, १,२९६ कोटींचा व्हॅट आणि १,३१० कोटी रुपयांचा राज्य उत्पादन शुल्क आदींचा यात समावेश आहे. गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्यात सातत्याने दुष्काळ पडत आहे. शेतीचे उत्पन्न घटल्याने उद्योगांवरच विभागाची अर्थव्यवस्था टिकून आहे. अशा परिस्थितीत महसुलात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. २०११-१२ यावर्षी ९,८०५ कोटी रुपये, २०१२-१३ यावर्षी ११,४७२ कोटी, २०१३-१४ यावर्षी ११,८५९ कोटी, तर २०१४-१५ यावर्षी १२,७५२ कोटींचा महसूल शासनाला मिळवून दिला होता.