शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

धरसोड वृत्तीमुळे स्थानिक कामगारांना नाकारतात उद्योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:05 IST

औरंगाबाद : स्थानिक कामगार उद्योगांमध्ये जास्त दिवस टिकून राहत नाहीत. मनाला वाटेल तेव्हा अर्ध्यावर काम सोडतात. आठ तासांच्या पुढे ...

औरंगाबाद : स्थानिक कामगार उद्योगांमध्ये जास्त दिवस टिकून राहत नाहीत. मनाला वाटेल तेव्हा अर्ध्यावर काम सोडतात. आठ तासांच्या पुढे ते काम करीत नाहीत, या प्रमुख कारणांमुळे त्यांना उद्योगांमध्ये नाकारले जाते, असा निष्कर्ष काही कामगार संघटना व कंत्राटदार संस्थांनी काढला आहे.

मागील सव्वा वर्षापासून लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे हजारो स्थानिक कामगारांचा लोंढा औद्योगिक वसाहतीत कामाच्या शोधार्थ पायपीट करीत आहे. मात्र, त्यांना कामावर घेण्यास कंपन्या धजावत नाहीत, यासंदर्भात काही कामगार संघटना व उद्योगांना कामगार पुरविणाऱ्या कंत्राटदार संस्थांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला असता समोर आलेले वास्तव अत्यंत धक्कादायक आहे. प्रामुख्याने उद्योगांना कुशल कामगारांची जास्त टंचाई जाणवत आहे. अकुशल स्वरूपाच्या कामांसाठी उद्योगांमध्ये सर्रासपणे कंत्राटदार संस्थांमार्फतच कामगार घेतले जातात. यामध्ये परप्रांतीय कामगारांचा जास्तीचा भरणा आहे. हे कामगार एकटे असल्यामुळे त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली, तर कंपनीत ते ८ तासांच्या शिफ्टऐवजी १२-१२ तास काम करतात. ते अर्ध्यावर काम सोडून निघून जात नाहीत. या उलट स्थानिक कामगारांमध्ये धरसोड वृत्ती जास्त आहे. त्यांना हंगामी स्वरूपाचे काम हवे असते. ते ८ तासांच्या पुढे कंपनीत थांबत नाहीत, त्यामुळे स्थानिकांना कंपन्यांमध्ये नाकारले जाते.

चौकट......

किमान वेतनापासून कामगार वंचित

यासंदर्भात ‘सीटू’चे लक्ष्मण साक्रूडकर यांनी सांगितले की, उद्योगांमध्ये मदतनीस (हेल्पर्स) म्हणून काम करणारे सर्वच कामगार परप्रांतीय नाहीत. यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक कामगारदेखील आहेत. कंपन्यांमध्ये अलीकडे स्थायी स्वरूपाच्या कामगारांची भरती होत नाही. कंत्राटदार संस्थांकडूनच अशा प्रकारचे कामगार घेतले जातात. मात्र, त्यांना राज्य विमा कामगार रुग्णालयाचे लाभ मिळत नाहीत. किमान वेतन दिले जात नाही. उद्योगांकडून ते दिले जात असेलही; परंतु अनेक कंत्राटदार कामगारांना या लाभापासून वंचित ठेवतात. याची पडताळणी उद्योगांच्या अधिकाऱ्यांनी, तसेच कामगार निरीक्षकांनी केली पाहिजे.