शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उद्योगांचे प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:06 IST

औरंगाबाद : यापूर्वी आणि आतादेखील उद्योगांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे. यासंदर्भात आठ दिवसांपूर्वीच पुनश्च एकदा ...

औरंगाबाद : यापूर्वी आणि आतादेखील उद्योगांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे. यासंदर्भात आठ दिवसांपूर्वीच पुनश्च एकदा सर्व उद्योगांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. ११ मार्चपासून लागू करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमध्ये उद्योगांना सहकार्य करण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये खंड पडणार नाही, असा आशावाद ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत यांनी व्यक्त केला.

यासंदर्भात ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त करताना ‘सीएमआयए’चे कमलेश धूत म्हणाले की, शहरात ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. मागील वर्षात लॉकडाऊनमुळे उद्योगांचे अर्थचक्र ठप्प झाले होते. यापार्श्वभूमीवर गुरुवारपासून होऊ घातलेल्या लॉकडाऊनमधून उद्योगांना वगळण्यात आले असल्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार नाही. रात्री नऊनंतर शहरातील कामगार कंपनीत नेणे किंवा कंपनीतील कामगार शहरात त्यांच्या घरी सोडण्यासाठी प्रशासन पासेस किंवा अन्य सुविधा देणार आहे, त्याबद्दल अद्याप मार्गदर्शक सूचना निघालेल्या नाहीत.

उद्योग संघटनांनी सर्व उद्योगांना कामगार, कर्मचारी, संचालक तसेच संबंधित व्यक्तींना मास्क लावणे, कंपनीत येताना हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, कंपनीत सुरक्षित अंतर राखणे, नियमित निर्जंतुकीकरण करण्यावर भर देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कंपनीत सदरील उपाययोजना यापूर्वीही राबविण्यात येत होत्या. गरज पडल्यास कंपनीतील कामगारांची पूर्वीप्रमाणे तपासणी केली जाईल. एकंदरीत उद्योगांच्या आरोग्याबरोबर समाजाचेही आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सर्व उद्योजक कटिबद्ध आहेत, असेही धूत यांंनी सांगितले.

चौकट.....

लॉकडाऊनबद्दल अफवा आणि भीती

शहरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर उद्योगांवर परिणाम होईल, अशा अफवा व भीती शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, वाळूज व पैठण रोड येथील औद्योगिक परिसरामध्ये पसरली होती. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमधून उद्योगांंना वगळल्यामुळे उद्योगांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. असे असले, तरी लॉकडाऊनमध्ये कोणत्या उपाययोजनांचे पालन करायचे, याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन ‘सीएमआयए’ने केले आहे.