शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उद्योगांचे प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:06 IST

औरंगाबाद : यापूर्वी आणि आतादेखील उद्योगांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे. यासंदर्भात आठ दिवसांपूर्वीच पुनश्च एकदा ...

औरंगाबाद : यापूर्वी आणि आतादेखील उद्योगांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे. यासंदर्भात आठ दिवसांपूर्वीच पुनश्च एकदा सर्व उद्योगांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. ११ मार्चपासून लागू करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमध्ये उद्योगांना सहकार्य करण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये खंड पडणार नाही, असा आशावाद ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत यांनी व्यक्त केला.

यासंदर्भात ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त करताना ‘सीएमआयए’चे कमलेश धूत म्हणाले की, शहरात ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. मागील वर्षात लॉकडाऊनमुळे उद्योगांचे अर्थचक्र ठप्प झाले होते. यापार्श्वभूमीवर गुरुवारपासून होऊ घातलेल्या लॉकडाऊनमधून उद्योगांना वगळण्यात आले असल्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार नाही. रात्री नऊनंतर शहरातील कामगार कंपनीत नेणे किंवा कंपनीतील कामगार शहरात त्यांच्या घरी सोडण्यासाठी प्रशासन पासेस किंवा अन्य सुविधा देणार आहे, त्याबद्दल अद्याप मार्गदर्शक सूचना निघालेल्या नाहीत.

उद्योग संघटनांनी सर्व उद्योगांना कामगार, कर्मचारी, संचालक तसेच संबंधित व्यक्तींना मास्क लावणे, कंपनीत येताना हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, कंपनीत सुरक्षित अंतर राखणे, नियमित निर्जंतुकीकरण करण्यावर भर देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कंपनीत सदरील उपाययोजना यापूर्वीही राबविण्यात येत होत्या. गरज पडल्यास कंपनीतील कामगारांची पूर्वीप्रमाणे तपासणी केली जाईल. एकंदरीत उद्योगांच्या आरोग्याबरोबर समाजाचेही आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सर्व उद्योजक कटिबद्ध आहेत, असेही धूत यांंनी सांगितले.

चौकट.....

लॉकडाऊनबद्दल अफवा आणि भीती

शहरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर उद्योगांवर परिणाम होईल, अशा अफवा व भीती शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, वाळूज व पैठण रोड येथील औद्योगिक परिसरामध्ये पसरली होती. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमधून उद्योगांंना वगळल्यामुळे उद्योगांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. असे असले, तरी लॉकडाऊनमध्ये कोणत्या उपाययोजनांचे पालन करायचे, याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन ‘सीएमआयए’ने केले आहे.