शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

राष्ट्रीय महामार्गावर हवी औद्योगिक वसाहत..!

By admin | Updated: May 12, 2017 23:47 IST

उस्मानाबाद : दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची लांबी-रूंदी वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची लांबी-रूंदी वाढत आहे. या महामार्गावर वाशी परिसरात औद्योगिक वसाहत उभारल्यास खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे चित्र पालटू शकते. याबरोबरच कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठीही मुख्यमंत्र्यांनी भरीव निधीची तरतूद करीत या कामाला आणखी गती देण्याची आवश्यकता असल्याच्या अपेक्षा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून व्यक्त होत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी उस्मानाबादी शेळी व्यवसायासाठी ठोस निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच उस्मानाबाद बसस्थानक विकसित करण्याची गरज आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे. तेर, ढोकी, तडवळा, येडशी पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीज बिलासाठी निधी द्यावा, सिंचन प्रकल्पासाठी भरीव तरतूद करावी, स्त्री रुग्णालयाची क्षमता वाढवित यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी, बंधारे दुरूस्तीसाठी निधी द्यावा, कौडगाव औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, पीक विमा वाटपासाठी चलन उपलब्ध करून द्यावे तसेच २०१५ मधील रबी हंगामातील पीक कापणी प्रयोगाची सखोल चौकशी करण्याची मागणी आ. पाटील यांनी केली आहे. आ. सुजीतसिंह ठाकूर यांनीही कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी शासनाने आणखी निधी उपलब्ध करून दिल्यास या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळेल, असे म्हटले आहे. सोलापूर-जळगाव आणि सोलापूर-हैदराबाद हे राष्ट्रीय महामार्ग चौपदरी होत आहेत. महामार्गाची लांबी-रूंदी वाढल्याने खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळेच या महामार्गावर वाशी परिसरात औद्योगिक वसाहत उभारल्यास या परिसराच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल, असे म्हटले आहे. आ. ज्ञानराज चौगुले यांनी जिल्ह्यात मग्रारोहयोची कामे मोठ्या संख्येने वाढविण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. निधीअभावी रखडलेल्या सर्व पेयजल योजनांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करावा, याबरोबरच तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मोफत सुविधा पुरविण्याचीही चौगुले यांची मागणी आहे. मराठवाड्याच्या हक्काच्या २१ टीएमसी पाण्यासाठी ठोस निधीची आवश्यकता आहे. सलग तीन वर्षांपासून दुष्काळ असताना भूम तालुक्याला अत्यंत कमी प्रमाणात पीक विमा मिळाला आहे. त्यामुळे याबाबत चौकशीची मागणी आ. राहुल मोटे यांनी केली आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी रोहयोअंतर्गत विहिरीची कामे झाली. मात्र, जलवाहिनीसाठी निधी नाही. यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. भूम, परंडा, वाशी तालुक्यात रोहयोची कामे बंद आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही कामे चालू झाली असून, ती दौऱ्यानंतर बंद करू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.जिल्ह्यातील अनेक विकासकामे निधीअभावी रखडली आहेत. विशेषत: पाटबंधारे विभागातील बंधारे, तलाव यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. तसेच जिल्ह्याला मिळणारे कृष्णा खोरेचे सात टीएमसी पाण्याचा प्म्न निधीअभावी गेल्या तीन वर्षांपासून रखडला आहे. तो प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अशी मागणी आ. मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे. उस्मानाबाद, नळदुर्ग येथल रुग्णालयातही अनेक समस्या असून, त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा वाटपाबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.