शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

राष्ट्रीय महामार्गावर हवी औद्योगिक वसाहत..!

By admin | Updated: May 12, 2017 23:47 IST

उस्मानाबाद : दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची लांबी-रूंदी वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची लांबी-रूंदी वाढत आहे. या महामार्गावर वाशी परिसरात औद्योगिक वसाहत उभारल्यास खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे चित्र पालटू शकते. याबरोबरच कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठीही मुख्यमंत्र्यांनी भरीव निधीची तरतूद करीत या कामाला आणखी गती देण्याची आवश्यकता असल्याच्या अपेक्षा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून व्यक्त होत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी उस्मानाबादी शेळी व्यवसायासाठी ठोस निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच उस्मानाबाद बसस्थानक विकसित करण्याची गरज आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे. तेर, ढोकी, तडवळा, येडशी पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीज बिलासाठी निधी द्यावा, सिंचन प्रकल्पासाठी भरीव तरतूद करावी, स्त्री रुग्णालयाची क्षमता वाढवित यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी, बंधारे दुरूस्तीसाठी निधी द्यावा, कौडगाव औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, पीक विमा वाटपासाठी चलन उपलब्ध करून द्यावे तसेच २०१५ मधील रबी हंगामातील पीक कापणी प्रयोगाची सखोल चौकशी करण्याची मागणी आ. पाटील यांनी केली आहे. आ. सुजीतसिंह ठाकूर यांनीही कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी शासनाने आणखी निधी उपलब्ध करून दिल्यास या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळेल, असे म्हटले आहे. सोलापूर-जळगाव आणि सोलापूर-हैदराबाद हे राष्ट्रीय महामार्ग चौपदरी होत आहेत. महामार्गाची लांबी-रूंदी वाढल्याने खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळेच या महामार्गावर वाशी परिसरात औद्योगिक वसाहत उभारल्यास या परिसराच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल, असे म्हटले आहे. आ. ज्ञानराज चौगुले यांनी जिल्ह्यात मग्रारोहयोची कामे मोठ्या संख्येने वाढविण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. निधीअभावी रखडलेल्या सर्व पेयजल योजनांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करावा, याबरोबरच तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मोफत सुविधा पुरविण्याचीही चौगुले यांची मागणी आहे. मराठवाड्याच्या हक्काच्या २१ टीएमसी पाण्यासाठी ठोस निधीची आवश्यकता आहे. सलग तीन वर्षांपासून दुष्काळ असताना भूम तालुक्याला अत्यंत कमी प्रमाणात पीक विमा मिळाला आहे. त्यामुळे याबाबत चौकशीची मागणी आ. राहुल मोटे यांनी केली आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी रोहयोअंतर्गत विहिरीची कामे झाली. मात्र, जलवाहिनीसाठी निधी नाही. यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. भूम, परंडा, वाशी तालुक्यात रोहयोची कामे बंद आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही कामे चालू झाली असून, ती दौऱ्यानंतर बंद करू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.जिल्ह्यातील अनेक विकासकामे निधीअभावी रखडली आहेत. विशेषत: पाटबंधारे विभागातील बंधारे, तलाव यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. तसेच जिल्ह्याला मिळणारे कृष्णा खोरेचे सात टीएमसी पाण्याचा प्म्न निधीअभावी गेल्या तीन वर्षांपासून रखडला आहे. तो प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अशी मागणी आ. मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे. उस्मानाबाद, नळदुर्ग येथल रुग्णालयातही अनेक समस्या असून, त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा वाटपाबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.