शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

इंडिगोच्या मुंबई विमानाचे नव्या वर्षात रोज ‘उड्डाण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:06 IST

औरंगाबाद : नव्या वर्षात औरंगाबादकरांना मुंबईचा विमान प्रवास दररोज करता येणार आहे. इंडिगोचे मुंबई - औरंगाबाद - मुंबई विमान ...

औरंगाबाद : नव्या वर्षात औरंगाबादकरांना मुंबईचा विमान प्रवास दररोज करता येणार आहे. इंडिगोचे मुंबई - औरंगाबाद - मुंबई विमान ८ जानेवारीपासून रोज उड्डाण करणार आहे.

कोरोनाच्या विळख्यामुळे मार्चपासून विमानसेवा बंद करण्यात आली होती. तब्बल ७ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर १५ ऑक्टोबरपासून मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली. प्रारंभी ही विमानसेवा आठवड्यातून ४ दिवस होती. त्यानंतर १६ नोव्हेंबरपासून ही विमानसेवा आठवड्यातून ३ दिवसांसाठी करण्यात आली. शहरातून मुंबईला ये-जा करणारे उद्योजक, राजकीय नेते यांच्यासह सर्वसामान्य प्रवाशांची संख्या अधिक आहे. कोरोना विळख्यातही विमानतळ आणि विमान प्रवासात घेण्यात येणाऱ्या खबरदारीमुळे विमान प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, केवळ आठवड्यातून तीनच दिवस मुंबईसाठी विमान उपलब्ध असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे मुंबईचे विमान दररोज सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती. अखेर ८ जानेवारीपासून इंडिगोने मुंबईसाठी रोज उड्डाण सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उद्योजक सुनीत कोठारी यांनी दिली.

सकाळच्या वेळेत सेवेची प्रतीक्षा

मुंबईसाठी सकाळच्या वेळेत विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. सकाळी मुंबईत पोहोचून दिवसभर कामकाज करून सायंकाळी पुन्हा औरंगाबादेत पोहोचता येईल, अशा पद्धतीची विमानसेवेची गरज आहे. यादृष्टीनेही विमान कंपन्यांकडे पाठपुरावा केला जात आहे.