शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरून केली संघटनवाढ

By admin | Updated: June 4, 2014 00:45 IST

अनुराग पोवळे, नांदेड नांदेड आणि गोपीनाथ मुंडे यांचे नाते जवळपास ४० वर्षांपासूनचे होते़ भाजपातील कोणताही प्रश्न मग तो निवडीचा असो की पक्षांतर्गत वादाचा़ तो मांडला जायचा

अनुराग पोवळे, नांदेड नांदेड आणि गोपीनाथ मुंडे यांचे नाते जवळपास ४० वर्षांपासूनचे होते़ भाजपातील कोणताही प्रश्न मग तो निवडीचा असो की पक्षांतर्गत वादाचा़ तो मांडला जायचा थेट गोपीनाथ मुंडे यांच्याच कोर्टात़ जनता युवा मोर्चाचे नेतृत्व स्वीकारल्यापासून ते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मराठवाड्यात औरंगाबादनंतर सर्वात मोठे शहर असलेल्या नांदेडमध्ये राजकीयदृष्ट्या संघटन वाढविण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांचे नेहमीच प्रयत्न राहिले़ केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले़ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखत असत़ मुंडे यांच्या नांदेडमधील सहकार्‍यांमध्ये कै़ भोजालाल गवळी, कै़ मदनमामा देशपांडे, माजी आमदार चंद्रकांत मस्की, नंदू कुलकर्णी, सुनील नेरलकर, लक्ष्मणराव गंजेवार, संभाजी पवार, डी़ बी़ पाटील, राम चौधरी, धनाजीराव देशमुख हे त्यांचे जुन्या काळातील सहकारी़ तर प्रवीण साले, चैतन्यबापू देशमुख, अरूंधती पुरंदरे, डॉ़ शोभा वाघमारे, डॉ़ अजित गोपछडे, श्रावण भिलवंडे, दिलीपसिंघ सोडी यांच्याशीही त्यांनी पक्षबांधणीसाठी नेहमीच चर्चा केली़ मुंडे यांनी प्रारंभीच्या काळात मोटारसायकलवरूनच संपूर्ण जिल्हा पालथा घातला होता़ संघटनावाढीचे ध्येय घेवून त्यांनी हा प्रवास केला़ आणीबाणीच्या काळात तरुंगवास भोगल्यानंतर १९७८ च्या निवडणुकीत नांदेडमधून चंद्रकांत मस्की यांचा विजय झाल्यानंतर मुंडे यांचे नेतृत्वगुण, त्यांच्यातील राजकीय कौशल्य पक्षापुढे आले होते़ तत्कालीन संघटनमंत्री वसंतराव भागवत यांनी मुंडे यांच्यासह प्रमोद महाजन यांच्यातील नेतृत्वगुणही जाणले होते़ त्याचआधारे मुंडे यांना १९८० मध्ये परळी विधानसभा निवडणुकीत उभे करण्यात आले होते़ त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सेनेशी युती करायची की नाही याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून विचारणा केली़ ही विचारणा त्यांनी स्वत: गावोगाव जावून केली होती़ नांदेडमध्ये आल्यानंतर ते विश्रामगृहावर थांबण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या निवासस्थानीच मुक्कामी राहत़ यातून ते जिल्ह्यातील परिस्थिती समजून घेत असत़ त्यांच्या संपर्कात आलेला कार्यकर्ता हा त्यांचाच होवून जायचा़ भारतीय जनता पार्टीतील गटबाजीने त्यांना नेहमीच चिंतीत केले होते़ त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचा नेहमीच संदेश दिला़ नांदेडमध्ये पक्षवाढीला चांगली संधी आहे अशी त्यांची नेहमीच धारणा होती़ पक्षबांधणीसाठी सुरुवातीला कार्यकर्ते सक्षम व्हावेत, अशी त्यांची भूमिका होती़ सहकार क्षेत्रात उतरल्याशिवाय विकास नाही हे जाणताना त्यांनी वैद्यनाथ बँकेच्या शाखा मराठवाड्यात सुरू केल्या़ त्यात नांदेडचाही समावेश होता़ २०१२ मध्ये नांदेड महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत नांदेड जिल्हा आपण दत्तक घेत असल्याची घोषणा त्यांनी केली होती़ त्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी मुंडे यांची नांदेडबाबतची महत्वाकांक्षा स्पष्ट झाली होती़ पक्षवाढीसाठी अनेकांना त्यांनी सोबत घेण्याचा प्रयत्न केला़ तसेच पक्ष सोडून जाणार्‍यांनाही त्यांनी पक्षात परत आणण्यासाठी प्रयत्न केले़ याच प्रयत्नात त्यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाचे राम चौधरी यांना पक्षात आणले़ तर मुखेडमध्ये राठोड बंधू आणि कंधार तालुक्यात भाई केशवराव धोंडगे यांच्याशी केलेली मैत्री हा त्याचाच भाग होता़ केवळ राजकीय बाबतीतच त्यांचा नांदेड जिल्ह्याशी संबंध आला असे नाही तर आपत्तीच्या काळातही त्यांनी जिल्ह्यातील जनतेला साथ देण्याचा प्रयत्न केला़ नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्येही शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुंडे यांनी नांदेडचा दौरा केला होता़ तसेच गोदापरिक्रमांतर्गतही जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देवून पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून जनतेच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला होता़