शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

दशकानंतर ऊसक्षेत्रात वाढ

By admin | Updated: December 31, 2016 22:08 IST

बीड मुबलक पावसामुळे दुष्काळी जिल्ह्यात ऊसाची लागवड सरासरीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

राजेश खराडे बीडमुबलक पावसामुळे दुष्काळी जिल्ह्यात ऊसाची लागवड सरासरीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. अद्यापपर्यंत १५ हजार हेक्टरवर ऊसाची लागवड झालेली असून, फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ३४ हजार हेक्टर एवढ्या सरासरी क्षेत्रावर लागवड होणार आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांची बेण्यासाठी धावपळ सुरू आहे.२००६ मध्ये अतिवृष्टी झाली होती. यावर्षी सुमारे ५४ हजार हेक्टरवर ऊसाची लागवड झाली असल्याची नोंद कृषी कार्यालयात आहे. मात्र, त्यानंतर सलग १० वर्षे जिल्ह्याच्या नशिबी दुष्काळी परिस्थिती ओढावल्याने ऊस लागवडीचे प्रमाण घटले होते. परिणामी खरीप - रबीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली होती.यंदा अतिवृष्टीमुळे खरिपाचे नुकसान झाले असले तरी रबी हंगामापासून पीक पद्धतीत शेतकऱ्यांनी बदली केला आहे. रबीतही पाच वर्षानंतर गव्हाच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे, तर आता ऊस लागवडीची लगबग सुरू आहे. सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार हेक्टर असले तरी ५० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.माजलगाव, गेवराई, परळी, धारूर, वडवणी या तालुक्यामध्ये ऊसाची अधिक लागवड केली जात आहे. केवळ ऊसावरच भर न देता उत्पादन वाढीच्या दृष्टीने आंतरपीक म्हणून कांदा व बटाटा तसेच भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. खऱ्या अर्थाने जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लागवडीचा जोर वाढणार आहे. अद्यापपर्यंत तीन ते चार हजार टनाप्रमाणे बेण्याची खरेदी करून २६५, १०००, ८००५, ८६०३२ या बेण्यांची लागवड केली जात आहे. माजलगाव, परळी तालुक्यातील ऊसाच्या क्षेत्राला माजलगाव धरणाचा मुबलक पाणीसाठा आहे. गेवराईकरिता जायकवाडी धरण, तर धारूरकरिता कुंडलिका धरणाचा आधार मिळणार आहे. मुबलक पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष केवळ उत्पादन वाढीवर आहे. सध्याच्या पाणीसाठ्यामुळे जूनपर्यंतची चिंता मिटली आहे.