शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

दशकानंतर ऊसक्षेत्रात वाढ

By admin | Updated: December 31, 2016 22:08 IST

बीड मुबलक पावसामुळे दुष्काळी जिल्ह्यात ऊसाची लागवड सरासरीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

राजेश खराडे बीडमुबलक पावसामुळे दुष्काळी जिल्ह्यात ऊसाची लागवड सरासरीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. अद्यापपर्यंत १५ हजार हेक्टरवर ऊसाची लागवड झालेली असून, फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ३४ हजार हेक्टर एवढ्या सरासरी क्षेत्रावर लागवड होणार आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांची बेण्यासाठी धावपळ सुरू आहे.२००६ मध्ये अतिवृष्टी झाली होती. यावर्षी सुमारे ५४ हजार हेक्टरवर ऊसाची लागवड झाली असल्याची नोंद कृषी कार्यालयात आहे. मात्र, त्यानंतर सलग १० वर्षे जिल्ह्याच्या नशिबी दुष्काळी परिस्थिती ओढावल्याने ऊस लागवडीचे प्रमाण घटले होते. परिणामी खरीप - रबीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली होती.यंदा अतिवृष्टीमुळे खरिपाचे नुकसान झाले असले तरी रबी हंगामापासून पीक पद्धतीत शेतकऱ्यांनी बदली केला आहे. रबीतही पाच वर्षानंतर गव्हाच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे, तर आता ऊस लागवडीची लगबग सुरू आहे. सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार हेक्टर असले तरी ५० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.माजलगाव, गेवराई, परळी, धारूर, वडवणी या तालुक्यामध्ये ऊसाची अधिक लागवड केली जात आहे. केवळ ऊसावरच भर न देता उत्पादन वाढीच्या दृष्टीने आंतरपीक म्हणून कांदा व बटाटा तसेच भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. खऱ्या अर्थाने जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लागवडीचा जोर वाढणार आहे. अद्यापपर्यंत तीन ते चार हजार टनाप्रमाणे बेण्याची खरेदी करून २६५, १०००, ८००५, ८६०३२ या बेण्यांची लागवड केली जात आहे. माजलगाव, परळी तालुक्यातील ऊसाच्या क्षेत्राला माजलगाव धरणाचा मुबलक पाणीसाठा आहे. गेवराईकरिता जायकवाडी धरण, तर धारूरकरिता कुंडलिका धरणाचा आधार मिळणार आहे. मुबलक पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष केवळ उत्पादन वाढीवर आहे. सध्याच्या पाणीसाठ्यामुळे जूनपर्यंतची चिंता मिटली आहे.