शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

उमरी तालुक्यात ‘प्रभारीराज’मुळे गैरसोय

By admin | Updated: June 28, 2017 00:29 IST

उमरी : प्रयोग करणारे उपक्रमशील शेतकरी, सुपीक जमीन, सिंचनाच्या सोयी अशा सर्व सुविधा असल्या तरी कृषी खात्याकडे पूर्णवेळ अधिकारीच नसल्याने शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाहीत़

बी.व्ही.चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : मोठ्या संघर्षानंतर सन १९९९ साली अस्तित्वात आलेल्या उमरी तालुक्याला महत्त्वाच्या खात्यात अनेक वर्षांपासून प्रभारी कारभार चालत असल्याने प्रशासकीय कामे ठप्प झाली़ पर्यायाने जनतेची गैरसोय होत असल्याचे विदारक चित्र आहे.कृषीसारख्या महत्त्वाच्या कार्यालयात वर्षानुवर्षे प्रमुख अधिकाऱ्यांचे पद रिक्त राहते़ जानवारी २०१६ पासून येथील पदभार धर्माबाद तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आहे़ तालुक्यातील शेतीचे क्षेत्र व होतकरू शेतकरी गट, पीक उत्पादनात नवनवीन प्रयोग करणारे उपक्रमशील शेतकरी, सुपीक जमीन, सिंचनाच्या सोयी अशा सर्व सुविधा असल्या तरी कृषी खात्याकडे पूर्णवेळ अधिकारीच नसल्याने शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाहीत़ सद्य:स्थितीत अनेक कृषी योजना अर्धवट स्थितीत पडून आहेत़ उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकाचे पद गेल्या आठ वर्षांपासून रिक्त आहे़ वैद्यकीय अधिकाऱ्यावर प्रभारी कार्यभार चालू आहे़ यामुळे वैद्यकीय सेवेबरोबर प्रशासकीय कामकाजावर याचा विपरीत परिणाम होत आहे़ नांदेड जिल्ह्यातील एक हेवी सेंटर म्हणून उमरीचे ग्रामीण रुग्णालय समजण्यात येते़ मात्र वैद्यकीय अधिकारी व प्रमुखांची पुरेशी सोय नसल्याने रुग्णांचे हाल होतात़ अंगणवाड्यांच्या कामकाजावर नियंत्रण असणारे एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी पद २ वर्षांपासून रिक्त आहे़ अगोदर लिपिकाकडे व नंतर आता प्रभारी बीडीओकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला़ एक वर्षापासून आहारभत्ता नाही, कार्यकर्ती, मदतनिसांचे मानधन ३ महिन्यापासून नाही, कर्मचाऱ्यांची प्रवासभत्ता बिले नाही, अशा अनेक समस्या या कार्यालयाकडे आहेत़तालुक्याच्या दोनशेपेक्षा अधिक ग्रामविकासाच्या योजना चालविणाऱ्या पं. स. बीडीओंचे पद गेल्या ९ महिन्यांपासून रिक्त आहे़ प्रभारी अधिकारी एम़ एऩ केंद्रे हे एकात्मिक बालविकास व पंचायत समितीचे बीडीओ अशा दोन्ही कार्यालयाचे कामकाज पाहतात़ महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रभारी आहेत़ तालुका भूमी अभिलेखचे उपअधीक्षक पद गेल्या १ वर्षापासून रिक्त असून मुदखेड येथील के़ एऩ जेठेवाड यांच्याकडे उमरीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला़जलसंपदा, पशुवैद्यकीय, टपाल, दूरध्वनी इ. कार्यालयांच्या बाबत अशीच स्थिती आहे़ येथे अधिकारी राहत नाहीत व कर्मचारीही पुरेसे नाहीत़ अशा प्रकारे तालुक्याच्या कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणेची अवस्था पाहता, जनतेची कामे वेळेवर व सुलभरीत्या कशी होणार, हा एक प्रश्नच आहे़