शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

सेंद्रीय शेतीतून मिळविले लाखोंचे उत्पन्न

By admin | Updated: December 16, 2015 23:33 IST

मोहन बारहाते, मानवत कोल्हावाडी येथील दिगंबर भिसे या शेतकऱ्याने सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न घेत शेतकऱ्यांना मानसिक बळ व प्रेरणा देण्याचे काम केले आहे़

मोहन बारहाते, मानवत सततचा दुष्काळ त्यामुळे जमिनीतील खोल गेलेली पाणी पातळी, रासायनिक खते आणि किटक नाशकांमुळे कमी झालेली उत्पादन क्षमता यावर मात करीत कोल्हावाडी येथील दिगंबर भिसे या शेतकऱ्याने सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न घेत शेतकऱ्यांना मानसिक बळ व प्रेरणा देण्याचे काम केले आहे़ कोल्हावाडी येथील दिगंबर भिसे यांनी २०१४ मध्ये जी-९ या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ऊतीसंवर्धित केळीची दोन एकरात लागवड केली़ ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली़ केळीला कुठलाही रासायनिक खत न वापरता केवळ शेणखताचा वापर केला़ परिणामी या पिकास चांगले उत्पादन झाले़ दोन एकरात ६०० क्विंटल केळीचे उत्पादन झाले़ तर केळीला ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला़ या तून खर्च वजा जाता त्यांना ३ लाख ५० हजार रुपयांचा नफा मिळाला़ यावर्षी त्यांनी पीलबाग राखून ठेवला़ त्यातील ५० टक्के झाडांची वेन झाली आहे़ त्याच्याच बाजुला दोन एकर क्षेत्रफळावर कोबीची लागवड केली असून, कोबीचा एक गड्डा दोन किलो वजनाचा असून, या गड्डयाला परभणी येथील बाजारपेठेत २५ रुपये किलोचा भाव मिळत आहे़ या पिकातूनही त्यांना अडीच लाख रुपयांचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे़ याशिवाय त्यांनी टोमॅटोचीही लागवड केली आहे़ ठिबक सिंचनाचा वापर करून कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे़ शेतकरी दिगंबर भिसे यांनी शेतीला सेंद्रीय खत मिळावे, यासाठी जाफर जातीच्या सहा म्हशी धुळे येथून खरेदी केल्या आहेत़ भिसे यांच्याकडे १५ जनावरे आहेत़ तंत्रज्ञान व प्रयत्नांची जोड आवश्यक निसर्गाच्या लहरीपणाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी केवळ नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून चालणार नाही़ बदलत्या परिस्थितीत पिकातही बदल करावा लागणार आहे़ या शिवाय उपलब्ध साधनसामुग्री, पाणी व जोड धंदा स्वीकारल्यास शेतीतूनही चांगले उत्पादन काढता येते़ यासाठी तंत्रज्ञानाला प्रयत्नाची जोड आवश्यक आहे़ -दिगंबर भिसे,कोल्हावाडी