शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
3
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
4
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
5
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
6
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
7
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
8
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
9
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
10
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
11
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
12
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
13
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
14
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
15
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
16
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
17
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
18
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
19
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
20
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

खैरेंच्या विकासकामांची चौकशी सुरू

By admin | Updated: July 14, 2017 00:44 IST

औरंगाबाद : शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव आणि खा. चंद्रकांत खैरे यांच्यातील राजकीय वैमनस्य आता प्रशासकीय उंबरठ्यावर जाऊन पोहोचले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव आणि खा. चंद्रकांत खैरे यांच्यातील राजकीय वैमनस्य आता प्रशासकीय उंबरठ्यावर जाऊन पोहोचले आहे. कन्नडचे उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकर यांनी खासदार निधीतून झालेल्या कामांची प्राथमिक स्तरावर चौकशी करण्यास गुरुवारी सुरुवात केली. ग्रामपंचायतीकडील कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर या चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना सादर करण्यात येणार आहे. हा अहवाल गोपनीय असेल. जिल्हाधिकारीच त्या अहवालावर निर्णय घेतील.प्रत्येक वर्षी खासदाराला पाच कोटी रुपये विकासनिधी म्हणून मिळतात. ही रक्कम खर्च करण्याचा निर्णय खासदार घेत असतात. आपल्या मतदारसंघात नागरिकांच्या गरजेनुसार योजना तयार केल्या जातात. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला जाते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे करवून घेते. खा. खैरे यांनी कन्नड मतदारसंघात जी गावेच नाहीत, त्या गावांत खासदार निधीतून कामे केल्याचे दाखविण्यात आले. खा. खैरे यांच्या निधीतून करण्यात आलेल्या त्या कामांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचे आ. जाधव यांनी २३ जून रोजी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. खापेश्वर, शिंदेवाडी, मांडवा, झाडेगाव तांडा आणखी काही गावे कन्नडमध्ये नाहीत. ‘ती’ गावे इतर कुठे असतील; परंतु कन्नडमध्ये असल्याचे दाखविले आणि गावे नसताना गावांच्या नावावर रक्कम उचलल्याचा आरोप ग्रामस्थांनी आ. जाधव यांच्याकडे केला होता. माझ्या मतदारसंघात अशी खोटी नाटी कामे होत असतील, तर मला बोलावेच लागेल, अशी भूमिका घेत आ. जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली. खैरेंवर शिवसेनेच्या सरपंचानेच आरोप केलेले आहेत, मी केलेले नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली होती. उपविभागीय अधिकारी म्हणाले,उपजिल्हाधिकारी श्रीमंत हरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, खा. खैरे यांच्या विकासनिधीतून झालेल्या कामांची प्राथमिक चौकशी केली आहे. चौकशीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल. तो अहवाल गोपनीय असेल. ग्रामपंचायतींकडून कागदपत्रे मागविली आहेत. त्यानुसार अहवाल तयार करण्यात येईल. चौकशीला जास्त दिवस लागणार नाहीत. तसेच चौकशी किती दिवसांत करावी, याचेही बंधन नाही. चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर तेच पुढील निर्णय घेतील.