शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

खासगी उद्योगांमध्येही राबवा आरक्षण धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:02 IST

औरंगाबाद : खासगी उद्योगांमध्येही राखीव जागांचे धोरण लागू करण्याचे आदेश आपल्या पंतप्रधानांना द्यावेत, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक तथा आंबेडकरी ...

औरंगाबाद : खासगी उद्योगांमध्येही राखीव जागांचे धोरण लागू करण्याचे आदेश आपल्या पंतप्रधानांना द्यावेत, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक तथा आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी एका पत्राद्वारे सरसंघचालक डाॅ. माेहन भागवत यांच्याकडे केली आहे.

डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण अत्यंत विवेकी आणि द्रष्टे सरसंघचालक आहात. या देशातील नागरिक आणि राष्ट्राची जी काळजी वाटते, ते स्मरून देशाचा विध्वंस होऊ नये आणि देशात अराजकता माजू नये म्हणूनच हा पत्रप्रपंच करत आहे. मध्यंतरी आपण संविधानातील ‘सामाजिक न्याय’ हे तत्त्व समोर ठेवून घेतलेली भूमिका न्यायोचित आहे. आपण म्हणाला होतात की, ‘जोपर्यंत शेवटचा घटक मला आता आरक्षण नको म्हणत नाही, तोपर्यंत आरक्षण सुरूच राहील, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका स्वागतार्ह आहे. मात्र, आपल्या पंतप्रधानांनी अनेक विभागांचे खासगीकरण करून राखीव जागांची तरतूद बेचिराख केली आहे. एकीकडे आपली सामाजिक न्यायाची भूमिका आणि दुसरीकडे त्याविराेधात पंतप्रधानांची कृती, याला आम्ही आपला अपमान समजावे का? सरसंघचालकांच्या भूमिकेविराेधात जाण्याचे पंतप्रधानांचे धाडस झालेच कसे, हे आश्चर्यकारक आहे.

मागासवर्गीय (एससी), अतिमागासवर्गीय (एसटी) आणि विशेष मागासवर्गीय (ओबीसी, डीएनटी, व्हीजेएनटी) यांच्या शैक्षणिक आणि नोकरीविषयक सोयी-सवलती काढल्यास पुढील काळात अराजकता जन्माला येऊ शकते. सामाजिक गुलामगिरी पुन्हा लादण्याची जर कोणी स्वप्न रंगवित असेल, तर ते काचेच्या घरात राहत आहेत, असे समजले पाहिजे.