शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव

By admin | Updated: August 23, 2014 00:46 IST

परभणी : जिल्ह्यात सोयाबीन पिकाला किडीने घेरले आहे. चक्रीभूंगा आणि खोडमाशीचा प्रादूर्भाव वाढला आहे.

परभणी : जिल्ह्यात सोयाबीन पिकाला किडीने घेरले आहे. चक्रीभूंगा आणि खोडमाशीचा प्रादूर्भाव वाढला आहे. यावर्षी जिल्ह्यात पिकांची परिस्थिती नाजूक आहे. दोन महिने उलटल्यानंतरही पाऊस समाधानकारक झाला नाही. शेतकऱ्यांना दोन, काही ठिकाणी तीनवेळा पेरणी करावी लागली. पेरलेले कसेबसे जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस या दोन मुख्य पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त आहे. पाऊस नसल्याने पिकांची वाढ मंद गतीने होत आहे. त्यातच रोगाचा प्रादूर्भाव झाला असल्याने पिके धोक्यात आली आहेत. सोयाबीन पिकावर सध्या चक्रीभूंगा आणि खोडमाशीचा प्रादूर्भाव दिसत आहे. या किडींनी अंडी घालू नयेत म्हणून सुरुवातीला ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, प्रादूर्भाव दिसू लागल्यास प्रादूर्भावग्रस्त फांद्या व खोड आतील अळीसह नष्ट करावे. पिकाचे नियमित सर्व्हेक्षण करुन किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास पुढील प्रमाणे फवारण्या कराव्यात. ट्रायझोफॉस ४० टक्के २० मि.ली., प्रोफेनोफॉस ५० टक्के २५ मि.ली., इथोफेनप्रॉक्स १० टक्के २० मि.मी. किंवा अ‍ॅसीफेट ७५ टक्के १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावे. खोड माशीच्या नियंत्रणासाठी वरील कोणत्याही एका कीटकनाशकासह थायोमीथोक्झाम २५ टक्के २-३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. फवारणीसाठी पॉवर स्प्रे असल्यास कीटकनाशकाची मात्रा तिप्पट करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रभाकर माळेगावकर व कीड नियंत्रक कमलाकर सुपेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)चक्रीभूंगा ही खोड पोखरणारी सोयाबीनवरील मुख्य कीड आहे. पिकांचे ३५ टक्क्यापर्यंतचे नुकसान या किडीमुळे होते. या किडीचा प्रौढ भूंगा व अळी या दोन अवस्था नुकसानकारक असतात. मादी भूंगा पानाचे देठ किंवा खोड यावर दोन समान काचा करते व खालच्या खाचेवर अंडी घालण्यासाठी तीन छिद्र पाडते. खाच केलेला खोडाचा वरचा भाग दोन-तीन दिवसांत सुकण्यास सुरुवात होते व पानाच्या देठावर खाचा केल्यास पान वाळून जाते. अंड्यातून निघालेली अळी पानाचे देठ व खोड पोखरत जमिनीकडे जाते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे झाडास शेंगा कमी लागतात व उत्पादनात घट होते. खोड माशी या किडीमुळे सोयाबीनचे १०० टक्के नुकसान होऊ शकते. मादी माशी झाडाच्या वरच्या पानामध्ये अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी पान पोखरुन शिरेपर्यंत पोहचून शिरेतून पानाच्या देठामध्ये शिरते. त्यानंतर अळी खोडात शिरते. अशा प्रकारे अळी आतील भाग खात जमिनीपर्यंत पोहचते व कोषामध्ये जाते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे झाडास फुले व शेंगा कमी लागतात. शेंगामध्ये दाणे लहान व सुरकुतलले असतात. तसेच खोड माशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यावर झाड पूर्णत: वाळून जाते. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.