शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीचा दूध संकलनावर परिणाम

By admin | Updated: May 12, 2015 00:48 IST

जालना : उन्हाचा फटका सर्वांनाच बसत आहे. उन्हाळ्यात दूध संकलनात कमालीची घट आली आहे. आज रोजी दिवसाकाठी दोन ते अडीच हजार एवढे दूध संकलित होत आहे.

जालना : उन्हाचा फटका सर्वांनाच बसत आहे. उन्हाळ्यात दूध संकलनात कमालीची घट आली आहे. आज रोजी दिवसाकाठी दोन ते अडीच हजार एवढे दूध संकलित होत आहे. चारा व पाणीटंचाईमुळे बहुतांश पशुपालकांनी जनावरांची विक्री सुरु केली आहे. परिणामी धवलक्रांतीला लगाम लागल्यााचे चित्र आहे.सर्वसाधारण जिल्ह्याची दूध उत्पादन क्षमता प्रतिदिन २ लाख ३० हजार एवढी आहे. हॉटेल,घरगुती वापरसाठी मोठ्या प्रमाणात दुधाची विक्री होते. त्यामुळे शासनाकडे होणारे दूध संकलन अत्यल्प असे आहे. खाजगी दूध संस्थांमधूनही बऱ्यापैकी दूध संकलित होत आहे. दुग्धोत्पादकांना शासनातर्फे १८.५ रूपये प्रति लिटरचा भाव दिला जातो. मात्र बोटावर मोजण्या इतकेच दूध उत्पादक शासनाकडे दुधाची विक्री करतात. बहुतांश दूध उत्पादक खाजगी कंपन्यांकडे दुधाची विक्री करतात.काही वर्षांपासून दुष्काळ जिल्ह्याची पाठ सोडत नसल्याने शेतीसह सर्वच उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम होत आहे. दुष्काळामुळे पाणी व चाऱ्याची सोय होत नसल्याने पशुपालक जनावरांची विक्री करण्यावर भर देतात. याचा फटका दूध उत्पादनावर होऊन संकलनावर होतो. जनावरांना पोषक आहार मिळत नसल्याने त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. जिल्ह्यात दूध संकलन कमी असल्याने नगर, सोलापूर, कोल्हापूर येथून खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात जिल्हाला दूधाचा पुरवठा करतात.जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी शासनामार्फत मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. विविध योजना आहेत. शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा योग्य फायदा घेण्याची गरज अधिकारी व्यक्त करतात. (प्रतिनिधी)