शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

रोजंदारीवर कार्यकर्ते गोळा करण्याची शक्कल

By admin | Updated: November 11, 2016 00:33 IST

कळंब पालिका निवडणुकीतील सर्वच पक्षांकडून प्रचाराचे नारळ फोडण्यात आले आहे़

उन्मेष पाटील कळंबपालिका निवडणुकीतील सर्वच पक्षांकडून प्रचाराचे नारळ फोडण्यात आले आहे़ या प्रचारात गर्दीचे ‘ग्लॅमर’ लाभावे यासाठी काही उमेदवारांनी रोजंदारीवर कार्यकर्ते गोळा करण्याची शक्कल लढविली आहे. या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी दिवसाकाठी ३०० रुपये रोजंदारी दिली जात आहे़शहरात सध्या पालिका निवडणुकीची हवा गरम आहे. सर्वच पक्षांनी प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. काही उत्साही उमेदवारांनी प्रशासनाने अधिकृतरीत्या चिन्ह वाटप करण्यापूर्वीच डिजिटल फलक लावण्याची घाई केली आहे. आपल्या पक्षाचे चिन्ह कायमस्वरुपी असल्याने चिन्ह वितरित करण्याची वाट कशामुळे बघायची, असा प्रश्नही या उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे. शहरात सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला असला तरी सर्वांनाच कार्यकर्त्यांची वाणवा जाणवत आहे. गावपुढाऱ्यांनी ‘यूज अँड थ्रो’ भूमिकेने कार्यकर्त्यांचा वापर केल्याने कार्यकर्ते विशेषत: युवक मंडळी सध्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उतरल्याचे दिसून येत नाही. सत्तेचा लाभ काही मूठभरांना दिला जातो व निवडणुकीत कार्यकर्त्यांना जाती-धर्माच्या नावावर भावनिक ब्लॅकमेल केले जाते व त्यांचा केवळ वापर केला जातो असा सूर या युवकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळेच सर्वच प्रमुख पक्षांना सध्या सक्रिय कार्यकर्त्यांची कमतरता भासत आहे. यावर उपाय म्हणून आता भाडेतत्त्वावर कार्यकर्ते घेतले जाऊ लागले आहेत. महिलांसह नागरिकांना ३०० रुपये दररोज प्रचारासाठी देण्याची आॅफर काही उमेदवारांनी दिली आहे़ तर युवकांची संख्या वाढविण्यासाठी काही उमेदवारांनी ४०० ते ५०० रुपये देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या सिझननंतर मोलमजुरी करणाऱ्या महिलांना हा ‘इलेक्शन’ सिझन चांगलच लाभदायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसभर प्रचार केल्यानंतर या प्रचारातील रोजंदारी कार्यकर्त्यांना भोजनाचीही व्यवस्था करण्यात आल्याची चर्चा आहे. पाच वर्षे कार्यकर्त्यांना न सांभाळणाऱ्या पुढाऱ्यांवर कंत्राटी कार्यकर्ते घेण्याची वेळ आली असताना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काही उमेदवारांकडे मात्र स्वखर्चाने प्रचारात उतरलेल्या कार्यकर्त्यांची चांगली फळी दिसून येत आहे. शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनीही या युवकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याने यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन घडून येईल, असा विश्वास या नवख्या उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे.