शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
3
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
4
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
5
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
6
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
7
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
9
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
10
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
11
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
12
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
13
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
14
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
16
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
17
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
18
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
19
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
20
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक

रोजंदारीवर कार्यकर्ते गोळा करण्याची शक्कल

By admin | Updated: November 11, 2016 00:33 IST

कळंब पालिका निवडणुकीतील सर्वच पक्षांकडून प्रचाराचे नारळ फोडण्यात आले आहे़

उन्मेष पाटील कळंबपालिका निवडणुकीतील सर्वच पक्षांकडून प्रचाराचे नारळ फोडण्यात आले आहे़ या प्रचारात गर्दीचे ‘ग्लॅमर’ लाभावे यासाठी काही उमेदवारांनी रोजंदारीवर कार्यकर्ते गोळा करण्याची शक्कल लढविली आहे. या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी दिवसाकाठी ३०० रुपये रोजंदारी दिली जात आहे़शहरात सध्या पालिका निवडणुकीची हवा गरम आहे. सर्वच पक्षांनी प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. काही उत्साही उमेदवारांनी प्रशासनाने अधिकृतरीत्या चिन्ह वाटप करण्यापूर्वीच डिजिटल फलक लावण्याची घाई केली आहे. आपल्या पक्षाचे चिन्ह कायमस्वरुपी असल्याने चिन्ह वितरित करण्याची वाट कशामुळे बघायची, असा प्रश्नही या उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे. शहरात सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला असला तरी सर्वांनाच कार्यकर्त्यांची वाणवा जाणवत आहे. गावपुढाऱ्यांनी ‘यूज अँड थ्रो’ भूमिकेने कार्यकर्त्यांचा वापर केल्याने कार्यकर्ते विशेषत: युवक मंडळी सध्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उतरल्याचे दिसून येत नाही. सत्तेचा लाभ काही मूठभरांना दिला जातो व निवडणुकीत कार्यकर्त्यांना जाती-धर्माच्या नावावर भावनिक ब्लॅकमेल केले जाते व त्यांचा केवळ वापर केला जातो असा सूर या युवकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळेच सर्वच प्रमुख पक्षांना सध्या सक्रिय कार्यकर्त्यांची कमतरता भासत आहे. यावर उपाय म्हणून आता भाडेतत्त्वावर कार्यकर्ते घेतले जाऊ लागले आहेत. महिलांसह नागरिकांना ३०० रुपये दररोज प्रचारासाठी देण्याची आॅफर काही उमेदवारांनी दिली आहे़ तर युवकांची संख्या वाढविण्यासाठी काही उमेदवारांनी ४०० ते ५०० रुपये देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या सिझननंतर मोलमजुरी करणाऱ्या महिलांना हा ‘इलेक्शन’ सिझन चांगलच लाभदायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसभर प्रचार केल्यानंतर या प्रचारातील रोजंदारी कार्यकर्त्यांना भोजनाचीही व्यवस्था करण्यात आल्याची चर्चा आहे. पाच वर्षे कार्यकर्त्यांना न सांभाळणाऱ्या पुढाऱ्यांवर कंत्राटी कार्यकर्ते घेण्याची वेळ आली असताना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काही उमेदवारांकडे मात्र स्वखर्चाने प्रचारात उतरलेल्या कार्यकर्त्यांची चांगली फळी दिसून येत आहे. शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनीही या युवकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याने यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन घडून येईल, असा विश्वास या नवख्या उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे.