शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

मी शेवटच्या श्वासापर्यंत रिपब्लिकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:07 IST

औरंगाबाद : मी शेवटच्या श्वासापर्यंत रिपब्लिकनच राहणार, अशी ग्वाही रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ...

औरंगाबाद : मी शेवटच्या श्वासापर्यंत रिपब्लिकनच राहणार, अशी ग्वाही रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे दिली. काही मंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतात; परंतु रिपब्लिकन ही ओळख पुसून टाकत आहेत, अशी टीकाही त्यांनी नाव न घेता प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली.

रिपाइं (ए) च्या मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात आयोजित मराठवाडा विभागीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.

येत्या २६ जानेवारीपर्यंत पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम संपली पाहिजे. जे नोंदणी करणार नाहीत, त्या पदाधिकाऱ्यांना बदलण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

भाजपबरोबर आपली युती आहेच. त्यात ज्या जागा मिळतील, त्यावर आपण लढूच; परंतु जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची चांगली तयारी करा, असा सल्ला आठवले यांनी दिला.

प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जिल्हा अध्यक्ष संजय ठोकळ यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद शेळके, पप्पू कागदे, ब्रम्हानंद चव्हाण, देवीदास कांबळे, मिलिंद जोशी, दिवाकर माने, संजय बनसोडे (उस्मानाबाद), एन. जी. दाभाडे (परभणी) आदींची यावेळी भाषणे झाली. व्यासपीठावर दौलत खरात, विजय मगरे, पुंजाराम जाधव, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवसरमोल आदींची उपस्थिती होती.

कॅप्शन..

रिपाइंच्या मराठवाडा विभागीय बैठकीत मार्गदर्शन करताना रामदास आठवले. व्यासपीठावर पक्षाची इतर नेतेमंडळी.