शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जगविख्यात पर्यटनस्थळे तरी दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:02 IST

औरंगाबाद : मराठवाड्याच्या राजधानीला मोठा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथील पर्यटनस्थळांची ख्याती जगभर पसरलेली आहे. पण राजकीय ...

औरंगाबाद : मराठवाड्याच्या राजधानीला मोठा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथील पर्यटनस्थळांची ख्याती जगभर पसरलेली आहे. पण राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे आज कित्येक पर्यटन स्थळे दुर्लक्षित आहेत.

वेरूळ, अजिंठा, बिबी का मकबरा, पानचक्की, दौलताबाद या चार ते पाच पर्यटन स्थळांकडे पर्यटक आकर्षित होतात. शहरात आलेले पर्यटक एक ते दीड दिवसच थांबतात, त्यानंतर ते अन्य शहरातील पर्यटन स्थळांकडे निघून जातात. जास्तीत जास्त पर्यटक शहरात थांबावेत, पर्यटन रोजगार वाढवा यासाठी ठोस असे प्रयत्नच झालेले नाहीत.

औरंगाबाद लेणी, पितळखोरा, गौताळा अभयारण्य, जायकवाडी पक्षी अभयारण्य प्रकल्प, कलाग्राम अशा कितीतरी चांगल्या स्थळांकडे पर्यटक जातच नाहीत. कारण पर्यटन रोजगाराचा औरंगाबादकरांनी कधी विचारच केलेला नाही. पर्यटन विकासासाठी राज्य व केंद्र शासनाकडून व्यापक प्रयत्न सुरू आहेत असे नुसते भासविण्यात येते. औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ आणि अजिंठा लेण्याचा समावेश जागतिक वारसा यादीत होतो, ही आपल्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट असली तरी ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण करण्यास पुरातत्त्व खाते कमी पडते आहे.

या गोष्टीकडे दुर्लक्ष

१) अजिंठा-वेरूळ आणि मकबरा, पानचक्की, दौलताबाद आदी पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनस्थळांवर काही अडचण निर्माण झाल्यास कोणाला भेटावे, शासनाचा अधिकृत व्यक्ती कोण?, असा प्रश्न पडतो. कारण मदतीसाठी कुठेच शासकीय कर्मचारी सापडत नाही.

२) प्रत्येक देशी किंवा विदेशी पर्यटक विमानाने येत नाही. अनेक पर्यटक रेल्वेने औरंगाबादेत दाखल होतात. रेल्वेस्टेशनवर उतरल्यावर पर्यटन स्थळांपर्यंत जायचे कसे असा मोठा प्रश्न त्यांना पडतो. स्टेशनवर एमटीडीसीचे कार्यालय, पर्यटकांना मार्गदर्शन करणारे कर्मचारी दिसत नाहीत. नागरिकांना विचारत पर्यटकांना मार्गक्रमण करावे लागते.

३) जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर मूलभूत सोयीसुविधा आणि ‘अतिथी देवो भव’ प्रमाणे पर्यटकांचे स्वागत चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते. पण, त्यासाठी पुढाकार कोणी घ्यावा असा प्रश्न शासकीय यंत्रणांना पडतो. राज्य पुरातत्व विभाग, केंद्रीय पुरातत्व विभाग आणि एमटीडीसी या सर्व यंत्रणा मूग गिळून गप्प असतात.

४) एमटीडीसीचे औरंगाबादेत विभागीय कार्यालय मागील अनेक वर्षांपासून आहे. या कार्यालयाला अधिकार ‘शून्य’ आहेत. टपाल कार्यालयासारखा याचा वापर करण्यात येतो. प्रत्येक बाबीची मंजुरी मुंबई कार्यालयातून घ्यावी लागते. विभागीय कार्यालयाला अधिकार काहीच नाहीत. पर्यटनाला चालना देणे, पर्यटकांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी या कार्यालयाला रुपयाचा निधीही उपलब्ध नाही.