शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

जगविख्यात पर्यटनस्थळे तरी दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:02 IST

औरंगाबाद : मराठवाड्याच्या राजधानीला मोठा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथील पर्यटनस्थळांची ख्याती जगभर पसरलेली आहे. पण राजकीय ...

औरंगाबाद : मराठवाड्याच्या राजधानीला मोठा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथील पर्यटनस्थळांची ख्याती जगभर पसरलेली आहे. पण राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे आज कित्येक पर्यटन स्थळे दुर्लक्षित आहेत.

वेरूळ, अजिंठा, बिबी का मकबरा, पानचक्की, दौलताबाद या चार ते पाच पर्यटन स्थळांकडे पर्यटक आकर्षित होतात. शहरात आलेले पर्यटक एक ते दीड दिवसच थांबतात, त्यानंतर ते अन्य शहरातील पर्यटन स्थळांकडे निघून जातात. जास्तीत जास्त पर्यटक शहरात थांबावेत, पर्यटन रोजगार वाढवा यासाठी ठोस असे प्रयत्नच झालेले नाहीत.

औरंगाबाद लेणी, पितळखोरा, गौताळा अभयारण्य, जायकवाडी पक्षी अभयारण्य प्रकल्प, कलाग्राम अशा कितीतरी चांगल्या स्थळांकडे पर्यटक जातच नाहीत. कारण पर्यटन रोजगाराचा औरंगाबादकरांनी कधी विचारच केलेला नाही. पर्यटन विकासासाठी राज्य व केंद्र शासनाकडून व्यापक प्रयत्न सुरू आहेत असे नुसते भासविण्यात येते. औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ आणि अजिंठा लेण्याचा समावेश जागतिक वारसा यादीत होतो, ही आपल्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट असली तरी ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण करण्यास पुरातत्त्व खाते कमी पडते आहे.

या गोष्टीकडे दुर्लक्ष

१) अजिंठा-वेरूळ आणि मकबरा, पानचक्की, दौलताबाद आदी पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनस्थळांवर काही अडचण निर्माण झाल्यास कोणाला भेटावे, शासनाचा अधिकृत व्यक्ती कोण?, असा प्रश्न पडतो. कारण मदतीसाठी कुठेच शासकीय कर्मचारी सापडत नाही.

२) प्रत्येक देशी किंवा विदेशी पर्यटक विमानाने येत नाही. अनेक पर्यटक रेल्वेने औरंगाबादेत दाखल होतात. रेल्वेस्टेशनवर उतरल्यावर पर्यटन स्थळांपर्यंत जायचे कसे असा मोठा प्रश्न त्यांना पडतो. स्टेशनवर एमटीडीसीचे कार्यालय, पर्यटकांना मार्गदर्शन करणारे कर्मचारी दिसत नाहीत. नागरिकांना विचारत पर्यटकांना मार्गक्रमण करावे लागते.

३) जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर मूलभूत सोयीसुविधा आणि ‘अतिथी देवो भव’ प्रमाणे पर्यटकांचे स्वागत चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते. पण, त्यासाठी पुढाकार कोणी घ्यावा असा प्रश्न शासकीय यंत्रणांना पडतो. राज्य पुरातत्व विभाग, केंद्रीय पुरातत्व विभाग आणि एमटीडीसी या सर्व यंत्रणा मूग गिळून गप्प असतात.

४) एमटीडीसीचे औरंगाबादेत विभागीय कार्यालय मागील अनेक वर्षांपासून आहे. या कार्यालयाला अधिकार ‘शून्य’ आहेत. टपाल कार्यालयासारखा याचा वापर करण्यात येतो. प्रत्येक बाबीची मंजुरी मुंबई कार्यालयातून घ्यावी लागते. विभागीय कार्यालयाला अधिकार काहीच नाहीत. पर्यटनाला चालना देणे, पर्यटकांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी या कार्यालयाला रुपयाचा निधीही उपलब्ध नाही.