शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

कापूस, ऊस, सोयाबीनमुळे तुरीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: December 12, 2014 00:54 IST

गंगामसला : नगदी पिके घेऊन आर्थिक व्यवहार जलदगतीने करण्यास शेतकरी आता पुढे येऊ लागला आहे. पूर्वी तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते.

गंगामसला : नगदी पिके घेऊन आर्थिक व्यवहार जलदगतीने करण्यास शेतकरी आता पुढे येऊ लागला आहे. पूर्वी तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. मात्र आता सोयाबीन, कापूस, ऊस या नगदी पिकांमुळे तुरीचा पेरा घटला आहे.गत चार ते पाच वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. अगोदरच संकटात सापडलेला शेतकरी आता दुष्काळाला तोंड देऊ लागला आहे. पिके हातून गेल्याने आर्थिक व्यवहारही ठप्प झाले आहेत. माजलगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी नगदी पिके घेऊन आर्थिक व्यवहार गतीमान केल्याचे चित्र दिसून येत आहे.यावर्षी माजलगाव तालुक्यातील गंगामसला परिसरातील एकूण ४ हजार १२६ हेक्टर क्षेत्रापैकी ८८६ हेक्टर एवढा पेरा कमी झाला आहे. या पेऱ्याचे कमी होण्याचे कारण केवळ दुष्काळजन्य परिस्थिती आणि तुरीवर होणारे विविध रोग हेच असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.तुरीचे पीक हे पारंपरिक पीक म्हणून घेतले जाते. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे तुरीचा पेरा केला जायचा. मात्र आता तुरीऐवजी सोयाबीन, कापूस ही नगदी पिके घेण्यात शेतकरी व्यस्त झाला आहे. कापसाच्या माध्यमातून जास्त पैसा मिळत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. तुरीवर कीड पडल्यानंतर मोठा तोटा सहन करावा लागतो. सर्वसामान्य शेतकऱ्याला हा तोटा सहन होणारा नसतो, त्यामुळे कमी शेती असणारे शेतकरीही आता नगदी पिके घेण्यास पसंती देऊ लागले आहेत. आहे त्या पिकांना भाव देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)