शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

केळी लागवड केल्यास जास्त उत्पादन

By admin | Updated: July 22, 2014 00:18 IST

रामेश्वर काकडे, नांदेड केळीची लागवड जून,आॅक्टोबर या तीन महिन्यांत केल्यास सर्वाधिक उत्पादन मिळते, असा निष्कर्ष नांदेड येथील केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी तीन वर्षे केलेल्या संशोधनाअंती काढला.

रामेश्वर काकडे, नांदेडकेळीची लागवड जून, जुलै व आॅक्टोबर या तीन महिन्यांत केल्यास सर्वाधिक उत्पादन मिळते, असा निष्कर्ष नांदेड येथील केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी सतत तीन वर्षे केलेल्या संशोधनाअंती काढला आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीअंतर्गत नांदेड येथील केळी संशोधन केंद्राच्या डॉ. एस. व्ही.धुतराज व प्रा.आर.व्ही.देशमुख या शास्त्रज्ञांनी मागील तीन वर्षांपासून केळी लागवडीवर प्रयोग केला आहे. प्रयोगाअंती लागवडीची शेतकऱ्यांसाठी शिफारस करण्यात आली आहे. केळीच्या अर्धापुरी तसेच ग्रॅन्डनैन या वाणाचे जास्तीत जास्त उत्पादन व आर्थिक लाभ मिळण्यासाठी लागवड जून अथवा जुलै महिन्यामध्ये करण्याची शिफारस मराठवाडा विभागासाठी करण्यात आली आहे.जून महिन्यामध्ये केळी लागवड केल्यास ७७.७ मेट्रिक टन उत्पादन निघाले असून खर्च वजा जाता निव्वळ ७ लाख २०४७५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर जुलै महिन्यात लागवड केलेल्या केळीचे हेक्टरी ७७.७ मेट्रिक टन उत्पादन निघाले. खर्च वजा जाता निव्वळ ६ लाख २६५०० रुपये उत्पन्न मिळाले. तर आॅक्टोबरमध्ये लागवड केल्यानंतर हेक्टरी ६९.४ मे.टन उत्पादन निघाले असून यातून ५ लाख ९२७५० रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. यासाठी शेतकऱ्यांनी विशेषता जून, जुलै व आॅक्टोबर या महिन्यात लागवड करावी, जेणेकरुन उत्पादन जास्त निघून दरही चांगले मिळाले आहेत.लागवडीपूर्व मशागत जमीन लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करुन दोन-तीन वेळा वखरणी करावी, मोठी ढेकळी असतील तर रोटाव्हेटरच्या सहाय्याने बारीक करुन जमीन भुसभुशीत करावी. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे, निचरा कमी आहे त्या शेतीमध्ये आधी धैंचा पेरावा आणि ४५ दिवसानंतर धैंचा जमिनीमध्ये गाडावा त्यानंतर लागवड करावी. त्यानंतर एक हजार रोपासाठी पाच ते सहा ट्रॉली शेणखत वापरावे. केळीसाठी जमीन चांगली तापलेली व मोकळी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे ज्या अंतरावर केळी लागवड करावयाची आहे, त्याच्या दोन महिने अधिच सऱ्या पाडण्याचे काम करणे योग्य ठरते.केळीच्या जातीमराठवाड्यात प्रामुख्याने नांदेड, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये अधापुरी व ग्रॅन्डनैन या जातीची लागवडीसाठी निवड केली जाते. या वाणाचा वापर वाढत आहे. ऊतीसंवर्धन रोपे तयार करण्यासाठी मातृवृक्षाची निवड करावी लागते. त्यासाठी वेगळÞे असे मातृरोपवाटिकेचे क्षेत्र असावे व असे क्षेत्र कीड व रोगमुक्त असावे. सरासरी २५ ते ३० किलो वजनाचा घड असलेल्या झाडाचे मुनवेच वापरलेले असावे. ऊतीसंवर्धित रोपांची लागवडरोपे लागवडीच्या आदल्यादिवशी ठिबक सिंचन संच चालवून जमीन ओली करुन घ्यावी व वाफसा स्थिती निर्माण झाल्यावर लागवड करावी.रोपांची लागवड पावसाळ््यात दिवसभर करता येते, परंतु अन्य हंगामात लागवड करताना दुपारी तीन वाजेनंतरच करावी. सर्वप्रथम रोपांची पिशवी हातामध्ये घेवून त्यातील माती हाताने काढावी, जेणेकरुन रुटबॉल फुटणार नाही. त्यानंतर डाव्या हाताच्या रोप मातीसह अलगद काढून घ्यावे. मातीच्या गोळ््यासह रोप एक बाय एक बाय एक फूट आकाराच्या खड्ड्यामध्ये अथवा सरीमध्ये ठेवावे. सोबत १० ग्रॅम प्रतिझाड फोरेट टाकावे.लागवडीसाठीचे हवामानकेळी हे उष्ण व कटीबंधीय पीक असून त्यास साधारण उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. साधारणत: केळी पिकास १२ ते ४० अंश तापमान चांगले ठरते.जमिनीची निवडज्या जमिनीमध्ये केळी लावायची आहे त्या जमिनीच्या प्रतीवर उत्पादन अवलंबून आहे. केळीसाठी जमीन भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणारी, हलक्या ते मध्यम प्रतीची पोयटायुक्त आणि सेंदिय कर्ब असलेली व ६ ते ७.५ सामू असलेली जमीन योग्य असते.क्षारता ०.०५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. नदीकाठची, क्षारयुक्त, चोपण जमिनीमध्ये केळीची लागवड करु नये.लागवडीचा हंगाम ऊतीसंवर्धन केळीची लागवड अतिउष्णतेचा कालावधी आणि अतिथंडीचा कालावधी सोडून वर्षभर करता येते. परंतु बाजारभावाचा विचार करुन लागवड करणे फायद्याचे ठरते.