शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

शेती आणि शेतकऱ्यांचा प्रामुख्याने विचार

By admin | Updated: March 1, 2016 00:38 IST

उस्मानाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सोमवारी सन २०१६-१७ चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर याबाबत जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

उस्मानाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सोमवारी सन २०१६-१७ चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर याबाबत जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. हा अर्थसंकल्प शेती व ग्रामीण भागाचा विकास करणारा असल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तर शेती मालाला हमीभाव, कर्जमाफी यासारखी शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी कुठलीही तरतूद या बजेटमध्ये नसल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार कसे, असा सवाल काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. लोकसभा निवडणुकीत दिलेल्या ‘अच्छे दिन’, ‘प्रत्येक भारतीयांच्या खात्यात १५ लाख’, ‘शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या ५० टक्के अधिक वाढ’ या मनाला भुरळ घालणाऱ्या घोषणांचं गेल्या वीस महिन्यात काय झाले, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांच्या बजेटचं ताक फुंकूणच प्यावे लागेल, अशी प्रतिक्रिया आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पिय भाषणात कृषी क्षेत्रावर भर दिल्याचा उल्लेख असून, पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे सांगितले. परंतु, संपूर्ण भाषणात शेतीमालाच्या हमी भावाचा साधा उल्लेख देखील नाही. मग, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल? बजेट सर्वसमावेशक असल्याचा डांगोरा पिटला जात असला तरी दलित, आदिवासी व अल्पसंख्यांक यांच्यावर केल्या जाणाऱ्या तरतुदीत प्रचंड कपात केली आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी केवळ संभाषण चातुर्याने शेती व ग्रामीण भागासाठी मोठी तरतूद केल्याचा अभास निर्माण केला असल्याचा आरोपही आ. पाटील यांनी केला आहे.शेतकरी आणि शेतीचा प्रामुख्याने विचार करीत आणि सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून बनविलेला हा अर्थसंकल्प आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग या सर्वच क्षेत्रांचा समतोल यात राखण्यात आला आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीच्या योजनांचा यात समावेश असून, दुग्ध विकासासाठी नव्या चार योजना तसेच मनरेगा अंतर्गत तब्बल आठ लाख तलावांच्या निर्मितीची तरतूदही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकरी, सर्वसामान्यांच्या हिताचा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी दिली. केंद्रीय बजेटमध्ये येत्या पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याची घोषणा केंद्र शासनाने केली आहे. मात्र, सिंचनासाठी कसलीही रक्कम दिलेली नसल्याने सिंचन क्षेत्र न वाढविताच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणार, हा प्रश्न पडतो. त्यामुळे केंद्र शासनाचा हा अर्थसंकल्प फसवा असल्याची टीका आ. मधुकरराव चव्हाण यांनी केली. देशातील अनेक भागात शेतकरी तीव्र दुष्काळाचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासाच द्यायचा असेल तर शासनाने कर्जमाफीची घोषणा करायला हवी होती. मात्र, त्याबाबत कसलाही शब्द बजेटमध्ये नाही. दुसरीकडे हजारो कोटी बुडविणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे या बजेटमध्ये शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्यांसाठी काहीही नाही.