शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

शेती आणि शेतकऱ्यांचा प्रामुख्याने विचार

By admin | Updated: March 1, 2016 00:38 IST

उस्मानाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सोमवारी सन २०१६-१७ चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर याबाबत जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

उस्मानाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सोमवारी सन २०१६-१७ चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर याबाबत जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. हा अर्थसंकल्प शेती व ग्रामीण भागाचा विकास करणारा असल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तर शेती मालाला हमीभाव, कर्जमाफी यासारखी शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी कुठलीही तरतूद या बजेटमध्ये नसल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार कसे, असा सवाल काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. लोकसभा निवडणुकीत दिलेल्या ‘अच्छे दिन’, ‘प्रत्येक भारतीयांच्या खात्यात १५ लाख’, ‘शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या ५० टक्के अधिक वाढ’ या मनाला भुरळ घालणाऱ्या घोषणांचं गेल्या वीस महिन्यात काय झाले, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांच्या बजेटचं ताक फुंकूणच प्यावे लागेल, अशी प्रतिक्रिया आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पिय भाषणात कृषी क्षेत्रावर भर दिल्याचा उल्लेख असून, पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे सांगितले. परंतु, संपूर्ण भाषणात शेतीमालाच्या हमी भावाचा साधा उल्लेख देखील नाही. मग, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल? बजेट सर्वसमावेशक असल्याचा डांगोरा पिटला जात असला तरी दलित, आदिवासी व अल्पसंख्यांक यांच्यावर केल्या जाणाऱ्या तरतुदीत प्रचंड कपात केली आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी केवळ संभाषण चातुर्याने शेती व ग्रामीण भागासाठी मोठी तरतूद केल्याचा अभास निर्माण केला असल्याचा आरोपही आ. पाटील यांनी केला आहे.शेतकरी आणि शेतीचा प्रामुख्याने विचार करीत आणि सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून बनविलेला हा अर्थसंकल्प आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग या सर्वच क्षेत्रांचा समतोल यात राखण्यात आला आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीच्या योजनांचा यात समावेश असून, दुग्ध विकासासाठी नव्या चार योजना तसेच मनरेगा अंतर्गत तब्बल आठ लाख तलावांच्या निर्मितीची तरतूदही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकरी, सर्वसामान्यांच्या हिताचा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी दिली. केंद्रीय बजेटमध्ये येत्या पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याची घोषणा केंद्र शासनाने केली आहे. मात्र, सिंचनासाठी कसलीही रक्कम दिलेली नसल्याने सिंचन क्षेत्र न वाढविताच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणार, हा प्रश्न पडतो. त्यामुळे केंद्र शासनाचा हा अर्थसंकल्प फसवा असल्याची टीका आ. मधुकरराव चव्हाण यांनी केली. देशातील अनेक भागात शेतकरी तीव्र दुष्काळाचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासाच द्यायचा असेल तर शासनाने कर्जमाफीची घोषणा करायला हवी होती. मात्र, त्याबाबत कसलाही शब्द बजेटमध्ये नाही. दुसरीकडे हजारो कोटी बुडविणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे या बजेटमध्ये शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्यांसाठी काहीही नाही.