शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनाचा विचार गुड सेन्स न राहता कॉमन सेन्स बनवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:05 IST

औरंगाबाद : परिवर्तनाचा विचार गुड सेन्स न राहता कॉमन सेन्स बनावा. परिवर्तनवादी विचार समाजात रुजले पाहिजेत. पोषण झाले ...

औरंगाबाद : परिवर्तनाचा विचार गुड सेन्स न राहता कॉमन सेन्स बनावा. परिवर्तनवादी विचार समाजात रुजले पाहिजेत. पोषण झाले पाहिजे आणि ते समाज व्यवहारही झाले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत मिलिंद आवाड यांनी देवगिरी महाविद्यालयाच्या फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत केले.

या ऑनलाइन व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी पंडितराव हर्षे होते. ‘परिवर्तनवादी विचार व समाज व्यवहार’ असा आवाड यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रारंभी व्याख्यानमालेचे समन्वयक उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार यांनी प्रास्ताविक करून आवाड यांचा परिचय करून दिला.

आवाड यांनी सांगितले की, भारतीय समाजात जातिव्यवस्था रुजलेली आहे आणि ती समाप्त करण्याचा प्रयत्न महामानवांनी केला. शाहू महाराजांनी आडनावे बदलून जातीय कलंकितपणा दूर करण्याचा प्रयत्न केला. अस्पृश्यांना नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून सन्मानित केले. परिवर्तनवादी धोरण अवलंबून मानखंडना दूर केली आणि समाजाचा व्यवहार बदलण्यास भाग पाडले. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः वेदना भोगल्या. सर्वच महामानवांनी मानवी व्यवहार आणि मानवतावादी दृष्टी आपल्या आयुष्यात जोपासली. यंदाच्या व्याख्यानमालेचे तिसावे वर्ष होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही व्याख्यानमला ऑनलाइन झाली. आवाड यांनी शनिवारी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफले.