शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परिवर्तनाचा विचार गुड सेन्स न राहता कॉमन सेन्स बनवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:05 IST

औरंगाबाद : परिवर्तनाचा विचार गुड सेन्स न राहता कॉमन सेन्स बनावा. परिवर्तनवादी विचार समाजात रुजले पाहिजेत. पोषण झाले ...

औरंगाबाद : परिवर्तनाचा विचार गुड सेन्स न राहता कॉमन सेन्स बनावा. परिवर्तनवादी विचार समाजात रुजले पाहिजेत. पोषण झाले पाहिजे आणि ते समाज व्यवहारही झाले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत मिलिंद आवाड यांनी देवगिरी महाविद्यालयाच्या फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत केले.

या ऑनलाइन व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी पंडितराव हर्षे होते. ‘परिवर्तनवादी विचार व समाज व्यवहार’ असा आवाड यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रारंभी व्याख्यानमालेचे समन्वयक उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार यांनी प्रास्ताविक करून आवाड यांचा परिचय करून दिला.

आवाड यांनी सांगितले की, भारतीय समाजात जातिव्यवस्था रुजलेली आहे आणि ती समाप्त करण्याचा प्रयत्न महामानवांनी केला. शाहू महाराजांनी आडनावे बदलून जातीय कलंकितपणा दूर करण्याचा प्रयत्न केला. अस्पृश्यांना नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून सन्मानित केले. परिवर्तनवादी धोरण अवलंबून मानखंडना दूर केली आणि समाजाचा व्यवहार बदलण्यास भाग पाडले. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः वेदना भोगल्या. सर्वच महामानवांनी मानवी व्यवहार आणि मानवतावादी दृष्टी आपल्या आयुष्यात जोपासली. यंदाच्या व्याख्यानमालेचे तिसावे वर्ष होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही व्याख्यानमला ऑनलाइन झाली. आवाड यांनी शनिवारी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफले.