शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

‘शेती पाहिजे, पण शेतकरी नवरा नको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:04 IST

घाटनांद्रा : लग्न म्हणजे भव्य समारंभ नव्हे, तर दोन मनांचा, दोन कुटुंबांचा, दोन संस्कारांचा होणारा संगम होय; मात्र आता ...

घाटनांद्रा : लग्न म्हणजे भव्य समारंभ नव्हे, तर दोन मनांचा, दोन कुटुंबांचा, दोन संस्कारांचा होणारा संगम होय; मात्र आता लग्नाच्या या धामधुमीत वधू मंडळीकडून केल्या जाणाऱ्या अजब अटींमुळे वरपित्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

बदललेली परिस्थिती व सुधारणांमुळे लग्न करताना मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परिणामी, शेतकरी मुलांचे लग्न करताना अनंत अडचणी येत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी मुलांचे बाशिंग जड झालेले आहे. पूर्वी शेती प्रथमस्थानी व नोकरी, व्यवसायाला दुय्यम स्थान दिले जात असे. त्यामुळे शेती व्यवसाय करणाऱ्या मुलाचे लग्न होण्यास फारशी अडचण येत नव्हती; पण जसजसा काळ बदलत गेला. तसतशी लग्नाची परिभाषा बदलत गेली आहे. मुली शिक्षण घेऊन मोठ्या झाल्यात. उच्च शिक्षण घेऊन नोकरी करू लागल्या. कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या वेळप्रसंगी सगळ्याच क्षेत्रात आपली अनोखी छाप त्या पाडत आहेत. त्यामुळे जोडीदाराबाबत त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.

नोकरी, शेती आणि चांगले घर असेल तर त्या मुलाच्या लग्नात अडचणी कमी येतात; पण ग्रामीण भागात आज अनेक युवक शेती करीत आहे. वडिलोपार्जित शेती करून चांगले उत्पन्न मिळवीत असतानादेखील शेतकरी मुलाला नकार घंटाच ऐकायला मिळत आहे. आजकाल मुली शिकून नोकरी करत असल्यामुळे आपला जोडीदारही नोकरी करणारा असावा, अशी त्यांची अपेक्षा वाढली आहे. नोकरीवाला नवरा पाहिजे, त्यातही त्याला सरकारी नोकरी पाहिजे. या भुमिकांमुळे शेतकरी मुलांची मात्र फार अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे.