शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘शेती पाहिजे, पण शेतकरी नवरा नको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:04 IST

घाटनांद्रा : लग्न म्हणजे भव्य समारंभ नव्हे, तर दोन मनांचा, दोन कुटुंबांचा, दोन संस्कारांचा होणारा संगम होय; मात्र आता ...

घाटनांद्रा : लग्न म्हणजे भव्य समारंभ नव्हे, तर दोन मनांचा, दोन कुटुंबांचा, दोन संस्कारांचा होणारा संगम होय; मात्र आता लग्नाच्या या धामधुमीत वधू मंडळीकडून केल्या जाणाऱ्या अजब अटींमुळे वरपित्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

बदललेली परिस्थिती व सुधारणांमुळे लग्न करताना मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परिणामी, शेतकरी मुलांचे लग्न करताना अनंत अडचणी येत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी मुलांचे बाशिंग जड झालेले आहे. पूर्वी शेती प्रथमस्थानी व नोकरी, व्यवसायाला दुय्यम स्थान दिले जात असे. त्यामुळे शेती व्यवसाय करणाऱ्या मुलाचे लग्न होण्यास फारशी अडचण येत नव्हती; पण जसजसा काळ बदलत गेला. तसतशी लग्नाची परिभाषा बदलत गेली आहे. मुली शिक्षण घेऊन मोठ्या झाल्यात. उच्च शिक्षण घेऊन नोकरी करू लागल्या. कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या वेळप्रसंगी सगळ्याच क्षेत्रात आपली अनोखी छाप त्या पाडत आहेत. त्यामुळे जोडीदाराबाबत त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.

नोकरी, शेती आणि चांगले घर असेल तर त्या मुलाच्या लग्नात अडचणी कमी येतात; पण ग्रामीण भागात आज अनेक युवक शेती करीत आहे. वडिलोपार्जित शेती करून चांगले उत्पन्न मिळवीत असतानादेखील शेतकरी मुलाला नकार घंटाच ऐकायला मिळत आहे. आजकाल मुली शिकून नोकरी करत असल्यामुळे आपला जोडीदारही नोकरी करणारा असावा, अशी त्यांची अपेक्षा वाढली आहे. नोकरीवाला नवरा पाहिजे, त्यातही त्याला सरकारी नोकरी पाहिजे. या भुमिकांमुळे शेतकरी मुलांची मात्र फार अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे.