शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

आई देवाघरी गेल्याचे चिमुकल्या मुलींना उमगलेच नाही...!

By admin | Updated: June 21, 2016 01:12 IST

औरंगाबाद : महिनाभरानंतर आई आजारपणातून बरी झाली होती...दुपारी माझ्यासोबत बोललीही...सायंकाळी मात्र काही बोलत नव्हती.

औरंगाबाद : महिनाभरानंतर आई आजारपणातून बरी झाली होती...दुपारी माझ्यासोबत बोललीही...सायंकाळी मात्र काही बोलत नव्हती. त्यामुळे रात्रभर आईजवळ बसून होते. सकाळीही आई बोलत नसल्याने शाळेत जाऊन सरांना सांगितले. तेव्हा सगळे सर घरी आले. आई देवाघरी गेल्याचे त्यांनी सांगितले. बालवयात मातृछत्र हरवलेल्या दोन चिमुकल्यांंना हे सांगताना अश्रू आवरणे कठीण झाले होते. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ त्यांचे घर आहे.संगीता राजू निसर असे या मयत मातेचे नाव आहे, तर अनिता आणि सुशीला अशी या दोन चिमुकलींची नावे आहेत. वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले. अशा परिस्थितीत आईने काबाडकष्ट करून मुलींना वाढविले. परंतु आईच्या उपचारासाठी अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ या दोन बहिणींवर आली. महिनाभरापूर्वी उपचारासाठी त्यांनी आईला घाटीत दाखल केले. या चिमुकलींवर ओढवलेल्या या प्रसंगाविषयी ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित करण्यात आल्यानंतर अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. उपचारानंतर आईला घेऊन घरी आले होते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा घाटीत गेले. तेव्हापासून आईला बरे वाटत होते, असे अनिताने सांगितले. परंतु रविवारी सायंकाळी आई अचानक शांत झाली. आईला काय झाले, हे मुलींना कळत नव्हते. त्यामुळे मुली रात्रभर आईजवळच बसून होत्या. आई सोडून गेली, याची कल्पनाही त्यांना नव्हती.सोमवारी सकाळीदेखील आई उठली नसल्याचे अनिताने शाळेच्या मुख्याध्यापिका टी.ए. देशमुख (मॉडर्न कन्या विद्यालय, गारखेडा) यांना सांगितले. देशमुख यांनी शिक्षक प्रा.शेषराव जाधव, शेख शफिक, जितेंद्र शिसोदे, एकनाथ मोटे यांना तिच्या घरी पाठविले. तिच्या आईचे निधन झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत घरी तिची आजी, मावशी आल्या होत्या. हलाखीच्या परिस्थितीमुळे अंत्यविधी कसा करावा, असा प्रश्न उभा राहिला. अनेकांनी मदतीसाठी पुढाक ार घेतला. मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यविधी झाला. नातेवाईकांची परिस्थिती बेताचीच आहे. चांगल्या भविष्यासाठी दोन्ही बहिणींची बालगृहात व्यवस्था केली जाणार असल्याचे बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अ‍ॅड.रेणुका घुले यांनी सांगितले.नियतीचा खेळज्या आईने वाढविले, स्वत: खस्ता खाल्ल्या, शिक्षण दिले, त्या आईला खांदा देण्याची वेळ येईल, असा विचारही कधी या चिमुकल्यांच्या मनात आला नसेल. परंतु नियतीने हा प्रसंग आणला. हे पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.