शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

माय हीच इरवाडची नायिका: श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST

ते प्रख्यात लेखक, कवी ना.तु. पोघे लिखित ‘इरवाड’ आत्मकथनाचे मसापच्या सभागृहात प्रकाशन प्रसंगी बोलत होते. डॉ.दादा गोरे अध्यक्षस्थानी ...

ते प्रख्यात लेखक, कवी ना.तु. पोघे लिखित ‘इरवाड’ आत्मकथनाचे मसापच्या सभागृहात प्रकाशन प्रसंगी बोलत होते. डॉ.दादा गोरे अध्यक्षस्थानी होते.

सबनीस म्हणाले, इरवाड आत्मकथन आहे की नाही, हे रसिक-वाचक ठरवतील. इरवाड हा मायलेकरांमधला संवाद आहे. आत्मकथनांमुळे दलित चळवळीची कोंडी झाली का, पुढे विषयच सापडू नये, ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न ना. तु. पोघे करताना दिसतात.

प्रसिद्ध समीक्षक प्रा.डॉ.संजय मून व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा.कैलास अंभुरे यांनी इरवाडवर भाष्य केले.

इरवाड हे आत्मकथन नाही. फार तर हे आत्मवृत्त आहे. या लालित्यपूर्ण आठवणी आहेत. आठवणींचा हा गहिवर म्हणजे इरवाड, यात प्रांजळपणा व संयतता आहे व जीवन चिंतनही आहे. ग्रामीण बोलीभाषेचा ऐवज आहे, इरवाड म्हणजे गारुड्याची थैली होय, असे डॉ.अंभुरे म्हणाले.

चळवळीच्या आकृती बंधात साहित्य अडकून पडले आहे. या साहित्याचा समारोप भारतीय साहित्यात होणार आहे. पारंपरिक आत्मकथनापलीकडचं हे आत्मकथन आहे. यात लेखक नायक नाही, तर गावगाडाच नायक आहे, असे विवेचन डॉ.संजय मून यांनी केले.

पोघे म्हणाले, मला आज दिवंगत गंगाधर पानतावणे, दिनकर बोरीकर, ल.बा.रायमाने, सुशीला मूल-जाधव, अविनाश डोळस यांची आठवण येत आहे. साहित्याच्या ललित गद्य पद्धतीने मी इरवाड लिहिले आहे. श्रमिकांच्या व महिलांच्या प्रतिष्ठेला मी यात महत्त्व दिले आहे. प्रेमाच्या अभावामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, असे माझे मत आहे. मी गरिबी पाहिलेली नाही. श्रीमंतीतच जगलो. त्यामुळे हे दलित माणसाचं आत्मकथन वाटणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ.दादा गोरे यांचे स्वागत डॉ.दासू वैद्य यांनी श्रीपाल सबनीस यांचे स्वागत के.ए. अतकरे यांनी केले. ना.तु. पोघे यांचे स्वागत श्रीपाल सबनीस यांनी केले. ललिता श्रीपाल सबनीस यांचे स्वागत डॉ.अरुणा लोखंडे यांनी केले. डॉ.संदीप भारुडे व प्रीती भारूडे यांनीही पाहुण्यांचे स्वागत केले. हास्यकवी प्रा.डॉ.विष्णू सुरासे यांनी सूत्रसंचालन केले. प्रीती भारुडे यांनी आभार मानले.